
Rohit Pawar, Ajit pawar plane crash conspiracy, ajit pawar eath Mystery
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर केवळ रोहित पवारच नव्हे, तर खासदार सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे चिरंजीव जय पवार यांनीही या प्रकरणातील संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधले आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात काही उच्चपदस्थ व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सदर्भातील अनेक गुपितेदेखील त्यांच्याकडे असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकरणातील गुढ वाढत चालले आहे.
Rahul Gandhi Threat Case: राहुल गांधींसह २५ खासदारांना धमकी देणाऱ्या राज सिंह आमेराला कोटामधून
रोहित पवार ज्या आक्रमकतेने या प्रकरणाचा तपास लावून धरत आहेत आणि मोठ्या नावांचा उल्लेख करत आहेत, त्यावरून पवार कुटुंबाने आता चिंता व्यक्त केली आहे. ही सत्य परिस्थिती समोर आणण्याच्या भूमिकेमुळे रोहित पवार यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे.
अजित पवार यांच्या विमान (Ajit Pawar Plane crash) अपघाताचा तपासही अतिशय संथगतीने सुरू आहे. सुरुवातीला ब्लॅक बॉक्स जळाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला, पण रोहित पवार यांच्या दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतर मात्र कंपनी वठणीवर आल्याचे दिसत आहे, त्यानंतर कंपनीने ब्लॅक बॉक्समधील डेटाही डाऊनलोड केल्याचे सांगितले जात आहे. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्वसामान्य जनतेमध्येही हा अपघात आहे की घातपात, यावरून शंका उपस्थित केल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग
रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वरिष्ठ पदांवर बसलेले उच्चपदस्थ, तपास यंत्रणा आणि प्रशासनावर सातत्याने आरोप करत आहेत. त्यावरून त्यांच्या जिवालाही धोका असल्याचा सूर पवार कुटुंबातून उमटू लागला आहे. पण रोहित पवार यांच्या जिवाला नेमका कुणाकडून धोका आहे. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण रोहित पवार यांनी मात्र त्यंच्या कुटुंबाला धोका असल्याचा दावा केला आहे. पत्नी, मुले, आई, सासरे आणि इतर नतेवाईंकांसह आपल्या जिवाला धोका असल्याची भिती वाटत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. पण त्याचवेळी आपण घाबरून प्रश्न विचारणे सोडून देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांनीही रोहित पवार यांना सरकारकडून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. तर विमान अपघाताच्या बाबत येणाऱ्या अहवालांचा हट्ट धरला आहे. संसदेत आम्ही या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी,अशी मागणी आम्ही केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.