CJP SChool Theek Karo Movement:...तर दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे ; लातुरच्या शाळा पाहून अभिजीत दिपकें आक्रमक
दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आता देशभरात सीजेपीने स्कूल ठिक करो मोहिमेला सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत काल (20 ऑगस्ट) अभिजीत दिपके यांनी लातूरमधील औसा तालुक्यातील उजनी इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. शिक्षणमंत्र्यांनी आणि आमदारांनी स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी आधी जिल्हा परिषद शाळेत पाठवायला पाहिजे, असंही दिपके यांनी म्हटलं आहे. (Abijeet Dipke Visit Latur ZP School)
CJP School Theek Karo Latur: बाहेरच्या शाळेतून विद्यार्थी आणले….; अभिजीत दिपकेंनी केली महापालिकेच्या
अभिजीत दिपके म्हणाले की, ” आजही शाळांवर पत्रे आहेत तेही पावसाळ्यात आजही पत्रे गळत आहेत. मुलांना बसायला बेचेंस नाहीत दहा वर्षांत तुम्हाला तेही जमलं नसेल तर तुम्ही काय केलं, शाळांची ही अवस्था पाहून मला नाही वाटतं दादा भुसेंनी या पदावर राहावं, त्यामुळे दादा भुसेंनी राजीनामा दिलाच पाहिजे. ज्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असले तर त्यांनी आधी स्वत:च्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवलं पाहिजे, त्या अवस्थेत तुमच्या मुलांनीनी शिकावंस असा टोलाही अभिजीत दिपकेंनी लगावला आहे.
अभिजीत दिपके यांनी लातुरच्या औसा जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली. या भेटीदरम्यान खाजगी शाळेचे विद्यार्थी शाळेत आणून बसवल्याचे निदर्शनास आले. खास बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपकेंसमोरच ते या शाळेचे विद्यार्थी नसल्याची कबुली दिली. औसा शहरातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत पीपल्स प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आणल्याचे आढळून आले.
स्कूल ठीक करो अभियानांतर्गत अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या अभियानाच्या शाळा भेटीदरम्यान हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Abijeet Dipke Visit Latur ZP School)
स्कूल ठिक करो मोहिमेंतर्गत आणखी एक प्रकार थेट ग्रामस्थांनीच उघडकीस आणला आहे. उजनी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंती आणि शौचालयांसाठी निधी मंजूर झाला असतानाही पाच वर्षांपासून काम सुरू झाले नसल्याचे ग्रामस्थांनी दिपके यांना सांगितले.
ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर दिपके यांनी थेट उजनीच्या ग्रामसेवकांना फोन करून निधी आणि रखडलेल्या कामाबाबत सवाल केले. पण ग्रामसेवकांनी चिडून उत्तर दिल्याचा दावा दिपके यांनी केला. इतकेच नव्हे तर शाळांच्या मूलभूत सुविंधांसह इतरही अनेक अडचणी ग्रामस्थांनी दिपकेंसमोर मांडल्या. संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे सातत्याने मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्या न्याय हक्कासाठी नागरिकांनी लढा दिला नाही तर अधिकारी मुजोर होतात असं दिपके यांनी सांगितले.






