
Shiv Sena Uday Samant Pune Press Conference on Local Body Elections 2026
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत असून आता सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले आहे. भंडारा येथे झालेल्या एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शेतकरी आत्महत्येवरून मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष केले. “विदर्भातील शेतकरी असूनसुद्धा रोज १० ते १५ शेतकरी आत्महत्या करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यांना बघण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. यावरूनच चर्चाना उधाण आले आणि महायुतीत आलबेल नसल्याच्या चारचा रंगू लागल्या. अश्यातच आता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही मोठे विधान केले असून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बघण्याची माझीही इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बच्चू कडू यांच्या विधानानंतर महायुतीतील वातावरण तापले असतानाच आता त्यांच्या या विधानावर मंत्री उदय सामंत यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. याबाबत बोलताना सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री पदाबाबत त्यांची मागणी असेल. शेतकऱ्यांच्या बाबत त्यांची मागणी होती. त्यांनी शेतकऱ्यांसाठी १ लाख रुपयांच्या सानुग्रहाची मागणी केली होती, मात्र ५० हजार सानुग्रह दिलं. मी बच्चू कडू यांच्याशी बोललो आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांची मागणी वैयक्तिक आहे. मात्र हि मागणी स्वाभाविक मागणी आहे. माझीही मागणी आहे कि, शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे. जशी भाजपची मागणी आहे फडणवीस मुख्यमंत्री व्हावे तशीच आमची मागणी असते. बच्चू भाऊंना ज्या सूचना करायच्या होत्या, विनंत्या करायच्या होत्या त्या केल्या आहेत,” असे ते म्हणाले. आता यावर भाजा नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Rajysabha Election: महायुतीत मोठे नाट्य! छगन भुजबळांची ‘ती’ अट दिल्ली भाजप श्रेष्ठींनी फेटाळली
विधानपरिषद निवडणुकांसंदर्भात नाशिकमध्ये झालेल्या बंडखोरीबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, “आज पुन्हा एकदा गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. मी अजून सकारात्मक आहे, दबाव टाकत नाही, विनंती करत आहे. गणेश गीते भाजपाच काम करत आहेत. त्यामुळे विनन्ती करण्यासाठी येत आहे. दबाव टाकायचा असता तर ४ वेळा मी बैठकीला आलो नसतो. नगरसेवकांवर विश्वास नाही असे नाही. राज्यात ११ ठिकाणी निवडणुका होत आहेत. फक्त नाशिकची चर्चा जास्त होत आहेत. संयमाने प्रश्न सुटावा असे आमचे मत आहे. सोलापूर, छ. संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी मागे घेतली आहे. उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत आम्ही गोकुळ गीते यांची वाट बघत होतो. प्रसाद हिरे यांच्याशीदेखील गिरीश महाजन चर्चा करतील,” असे ते म्हणाले.
NCP Rajya sabha Candidate: भुजबळांचा पत्ता कट; राष्ट्रवादीकडून बड्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी