
'ऑपरेशन टायगर' बद्दल उदय सामंतांचे मोठे वक्तव्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित खासदारफुटीच्या चर्चांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या कोणत्याही खासदारासोबत संपर्क नसल्याचे सांगत अशी कोणतीही मिटिंग झाली नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला ऑपरेशन टायगरची गरज नाही, असे म्हणत त्यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी संजय राऊतांवरदेखील भाष्य करत ‘संजय राऊतांनी उबाठाचं अस्तित्व टिकवलं आहे,’ असे म्हंटले आहे. उदय सामंतांच्या विधानामुळे ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात नसल्याचे समाजत असले तरीही, येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी अधिक स्पष्ट होतील.
ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान
कथित खासदारफुटीच्या चर्चांवरून शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांची बैठक पार पडली होती. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. सोमवारी 22 जून रोजी दुपारी चार वाजता हि मिटिंग ठेवण्यात आली असून मंत्रालयासमोरील ‘शिवालय‘ येथे हि बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
कथित खासदारफुटीवरून संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा एकच गट असून तो खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. खासदार फुटू शकतात, अशा चर्चा आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहोत. काल सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते. आज सकाळीदेखील आमचे खासदारांशी बोलणे झाले आहे.”
लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करण्याच्या चर्चांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, “आज उद्धव ठाकरे आणि संजय देशमुख यांच्यात काही कामानिमित्त चर्चा झाली. आणखी दोन खासदारांशीही ठाकरे यांनी संवाद साधला आहे. तरीही काही खासदार अध्यक्षांना पत्र द्यायला गेले असतील असे वाटत असेल, तर त्या पत्राचा मसुदा समोर आल्यावरच त्याबाबत बोलू.”
Sanjay Nirupam : ‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात