‘अहंकारामुळेच उबाठा बुडेल’; उद्धव ठाकरेंवर संजय निरुपमांचा घणाघात
निरुपम पुढे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांनी उघडपणे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर आरोप लावला होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे खासदारांना भेटत नाही, अशी नाराजी खासदारांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. नुकताच पार पडलेल्या नगर परिषदा, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले आणि प्रचाराला गेले नाहीत. त्यामुळेही ठाकरेंवर खासदार, आमदार आणि पदाधिकारी प्रचंड नाराज असल्याचा दावा निरुपम यांनी केला.
ऑपरेशन टायगरची ठाकरेंना धास्ती? खासदार फुटीबाबत संजय राऊतांचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर ही अफवा आहे, मात्र यामुळे उबाठा नेतृत्व घाबरलेलं आहे. ते घरात बसून काम करतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार असल्याची टीका निरुपम यांनी केली. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रात दौरा सुरु आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही शिवसंवाद दौरा सुरु असून त्यात ते राज्यभरत पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला ऑपरेशन टायगरची आवश्यकता नाही, असे निरुपम म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या अहंकारामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट निर्माण केला. अशीच परिस्थिती उबाठामध्ये आहे, असे निरुपम म्हणाले. उबाठा खासदार संजय राऊत कोणाला लांडगा म्हणतात, असा टोला निरुपम यांनी लगावला. त्यांचे खासदार उबाठाच्या नेतृत्वाला वैतागलेले आहेत, असे ते म्हणाले. राऊत स्वत: एक लबाड लांडगा आहेत, अशी टीका निरुपम यांनी केली.






