फोटो सौजन्य- pinterest
ग्रहण आणि त्याच्या सुतक काळामध्ये ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिकरित्या अशुभ वेळ मानली जाते. असे मानले जाते की, ग्रहणाच्या वेळी वातावरण नकारात्मक होते. यावेळी लवकरच वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे चंद्रग्रहण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी असणार आहे. यावेळी चंद्रग्रहण मंगळवार, 3 मार्च रोजी आहे. हे चंद्रग्रहण सिंह राशी आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे.
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. यावेळी याचे सुतक काळ असणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी सुतक काळ 9 तास आधी लागते. ग्रहणाच्या वेळी पूजा पाठ आणि खाणे पिणे वर्जित मानले जाते. पण काही लोकांना असा प्रश्न पडतो की, चंद्रग्रहण दरम्यान अंत्यसंस्कार करावेत का? ग्रहणादरम्यान अंतिम संस्कार करणे योग्य की अयोग्य जाणून घ्या
धर्मशास्त्रानुसार जन्म आणि मृत्यू हे अनिवार्य आणि कालबद्ध घटनांपैकी आहेत. शास्त्रानुसार, चंद्रग्रहणा दरम्यान किंवा सुतक काळ लागल्यावर अंत्यसंस्कार करणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की, ग्रहणावेळी किंवा सुतक काळामध्ये अंतिमसंस्कार केल्याने त्याचा नकारात्मक प्रभाव कुटुंबावर होताना दिसून येतो. ग्रहणाच्या वेळी अंत्ययात्रा काढत नाही कारण कुटुंबावर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या कारणामुळे ग्रहणादरम्यान अंत्यसंस्कार करणे शुभ मानले जात नाही.
ग्रहण लागल्यावर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे पार्थिव सुरक्षित ठिकाणी ठेवावे. त्यानंतर ज्यावेळी ग्रहण पूर्ण संपेल त्यानंतर त्या मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावे. चंद्र किंवा सूर्यग्रहणाचा कालावधी जास्त नसतो. यामुळे ग्रहण काळात वाट बघणे गरजेचे असते. याप्रकारे सुतक काळात अंत्यसंस्कार करू नयेत.
ग्रहणकाळात सूतक मानले जाते, परंतु मृत्यू झाल्यास कुटुंबात सूतक आधीच लागू होते. त्यामुळे अशा वेळी ग्रहणामुळे अतिरिक्त अडथळा येत नाही, असे काही धर्मग्रंथांमध्ये नमूद आहे.
शक्य असल्यास ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे.
मंत्रोच्चार आणि शुद्धीकरण विधी करावेत.
अंत्यसंस्कारानंतर दानधर्म आणि प्रार्थना करावी.
आजच्या काळात पाहिला गेले तर चंद्रग्रहण हा केवळ खगोलशास्त्रीय घटक मानला जातो. आरोग्य किंवा सामाजिक कारणांमुळे अंत्यसंस्कार पुढे ढकलणे अनेकदा शक्य नसते. त्यामुळे धार्मिक श्रद्धा आणि व्यावहारिक परिस्थिती यांचा समतोल साधणे महत्त्वाचे ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलशास्त्रीय घटना आहे. पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये आल्यावर चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, तेव्हा चंद्रग्रहण होते.
Ans: धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश किंवा इतर मंगलकार्ये टाळण्याची प्रथा आहे.
Ans: धर्मशास्त्रानुसार मृत्यू हा विलंब न करता पार पाडायचा विधी मानला जातो. त्यामुळे अत्यावश्यक असल्यास चंद्रग्रहणाच्या दिवशी अंत्यसंस्कार करणे निषिद्ध मानले गेलेले नाही.






