फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. राहू इतर ग्रहांप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. या ग्रहाची एखाद्यावर शुभ दृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते.
ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. दरम्यान, सध्या राहू कुंभ राशीत विराजमान असून 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजून 57 मिनिटांनी मंगळ ग्रहदेखील कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या दोन्ही ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींना लाभदायी ठरेल.
मेष राशीच्या लोकांसाठी राहू-मंगळाची युती खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. घरात शुभ कार्य होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल.
या राशीच्या व्यक्तीसाठीही ही युती खूप खास असेल. या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल, तणावमुक्त व्हाल. आयुष्यात मानसिक शांती मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल, विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल. आकस्मिक धनलाभ होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठीही राहू-मंगळाची युती आनंदात जाईल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानी पडतील, उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक चणचण भासणार नाही. या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. नोकरी व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
या राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते. ते शक्र होते, ते शक्य करून दाखवाल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
या राशीच्या व्यक्तींसाठी राहू-मंगळाची युती खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल, करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: जेव्हा राहु आणि मंगळ एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्याला राहू-मंगळ युती म्हणतात. ही युती ऊर्जावान आणि परिणामकारक मानली जाते.
Ans: मंगळ हा कृती, धैर्य आणि नेतृत्वाचा कारक आहे, तर राहू अचानक बदल, परदेश, तंत्रज्ञान आणि अनपेक्षित लाभाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ही युती अचानक संधी आणि वेगवान निर्णयांची परिस्थिती निर्माण करू शकते.
Ans: राहू मंगळ युतीमुळे मेष, मिथुन, कन्या, धनु आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार






