फोटो सौजन्य- pinterest
स्वामीनारायणांनी समाजातील अंधश्रद्धा, कुरीती आणि अन्याय यांना विरोध केला. त्यांनी लोकांना सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि ईश्वरभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या शिकवणीमुळे समाजात शांती, एकता आणि नैतिक मूल्यांची जपणूक झाली. तत्कालीन समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे.
स्वामीनारायण जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये आणि घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भगवान स्वामीनारायण यांची विशेष पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन आणि सत्संग धार्मिक प्रवचन आणि कथा, मध्यरात्री जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. त्यानंतर प्रसादाचे वितरण केले जाते.
या दिवशी भक्त उपवास करतात आणि पूर्ण दिवस ईश्वरभक्तीत रमून जातात. स्वामीनारायण संप्रदायाचा सर्वात मोठा आणि मुख्य भक्त परिवार गुजरात राज्यात आहे, जिथे अहमदाबाद आणि वडताल येथे मुख्य केंद्रे (गादी) आहेत. याव्यतिरिक्त, स्वामीनारायण संप्रदायाचे अनुयायी मुंबई, महाराष्ट्र, भारतभर आणि अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या परदेशातही मोठ्या संख्येने पसरलेले आहेत. तसेच बीएपीएस (BAPS) संस्थेचे जगभरात मोठे जाळे आहे.
स्वामीनारायण जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एक महत्त्वाचा संदेश देतो — सदाचार, सेवा आणि समर्पण. आजच्या काळातही त्यांच्या शिकवणी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांनी शिकवले की, प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, संयम आणि सेवा वृत्ती ठेवली पाहिजे.
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात स्वामीनारायणांच्या शिकवणी अधिकच उपयुक्त ठरतात. त्यांनी दिलेले मूल्ये प्रामाणिकपणा, संयम, सेवा आणि श्रद्धा ही प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारी आहेत.
त्यांचा संदेश असा आहे की, “स्वतःचे जीवन शुद्ध ठेवा आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करा.” आजच्या समाजात वाढणारी असहिष्णुता, ताणतणाव आणि नैतिक अधःपतन यावर उपाय म्हणून त्यांच्या विचारांची गरज अधिक आहे. स्वामीनारायणांचे भक्त त्यांचे विचार देशाविदेशात पोहोचविण्यासाठी तन, मन, धन अर्पण करतात. त्यांच्या विचार, त्यांचे शिकवण जगभरात पोहोचवण्यासाठी स्वामीनारायण संप्रदाय प्रचंड मेहनत घेत आहे. आज जगभरातील स्वामीनारायण यांची भव्य दिव्य मंदिरे, तेथील सामाजिक उपक्रम पाहिल्यानंतर असं दिसून येतं की, स्वामिनारायणांचे विचार विश्वभरातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भगवान स्वामीनारायण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जाणारा पवित्र उत्सव म्हणजे स्वामीनारायण जयंती.
Ans: अध्यात्मिक जागृतीसाठी, नैतिक मूल्ये वाढवण्यासाठी, समाजसेवेची प्रेरणा देण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.
Ans: भगवान स्वामीनारायण यांनी सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि ईश्वरभक्ती यांचा संदेश दिला. त्यांनी अंधश्रद्धा आणि कुरीतींविरुद्ध समाजाला जागृत केले






