
Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यंदा गणेशोत्सव कधी आहे? आणि ऋषीपंचमी, गौरी आगमन, अनंत चतुर्दशी कधी आहे? याची सगळी माहिती आपण आज सोप्या भाषेत बघूया.यंदा गणेश चतुर्थी कधी आहे?पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला येते आणि अनंत चतुर्दशीला संपते. यंदा २०२६ मध्ये गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला आहे.Ganesh Chaturthi 2026:
चतुर्थी तिथी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी संपेल. पण उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी १४ तारखेलाच धरली जाणार आहे.पूजेचा शुभ मुहूर्त कोणता?बाप्पाची स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त बघणं खूप गरजेचं असतं. यंदा पूजेचा मुहूर्त सकाळी ११ वाजून २ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३१ मिनिटांपर्यंत आहे. जवळपास अडीच तासांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे. या वेळेतच बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. या दिवशी चंद्र पाहू नये अशी मान्यता आहे.
चंद्र दिसण्याची वेळ रात्री ८ वाजून ४४ मिनिटे आहे, त्यामुळे त्यावेळी चंद्राकडे पाहणे टाळा.गणेशोत्सवातील इतर महत्त्वाचे दिवसगणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत १०-११ दिवस खूप धामधूम असते. सप्टेंबर महिना यंदा सणांचाच असणार आहे.१५ सप्टेंबर, मंगळवार – ऋषीपंचमी
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी ऋषीपंचमी आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला हा सण येतो. महिला या दिवशी सप्तर्षींची पूजा करतात आणि उपवास करतात. याच दिवशी शेगावचे गजानन महाराज यांची पुण्यतिथी पण आहे.१७ सप्टेंबर, गुरुवार – ज्येष्ठा गौरी आगमन
महाराष्ट्रात गणपतीसोबतच गौरींचं पण तितकंच महत्त्व आहे. १७ तारखेला संध्याकाळी गौरींचं आगमन होईल. संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत आवाहन करता येईल. बऱ्याच घरात या दिवशी माहेरवाशिणी म्हणजे गौरी घरी येते असं मानतात.१८ सप्टेंबर, शुक्रवार – ज्येष्ठा गौरी पूजन
दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आहे. गौरीला पार्वती मातेचं आणि महालक्ष्मीचं रूप मानतात. गणपतीची आई घरी आली म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. महिला या दिवशी नवीन साडी, दागिने घालून गौरीची पूजा करतात, नैवेद्य दाखवतात.१९ सप्टेंबर, शनिवार – गौरी विसर्जन
तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन होईल. याच दिवशी दुर्गाष्टमी पण आहे.२५ सप्टेंबर, शुक्रवार – अनंत चतुर्दशी
हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. या दिवशी आपण सगळे बाप्पाला निरोप देतो. सकाळी पूजा, आरती करून मिरवणुकीने बाप्पाला विसर्जनासाठी नेलं जातं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत डोळ्यात पाणी आणून निरोप दिला जातो.तर मित्रांनो, या तारखा लक्षात ठेवून आतापासूनच तयारीला लागा. बाप्पाच्या स्वागतासाठी सगळं घर सजवायचं आहे.