Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दुसरे गांधी’ अण्णा हजारेंचा निर्धार यशस्वी; लोकपाल आंदोलनाचा शेवट गाजला, जाणून घ्या 09 एप्रिलचा इतिहास

आण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले

  • By प्रीति माने
Updated On: Apr 09, 2026 | 10:56 AM
Anna Hazare agitation against the Lokpal Bill ended April 9th ​​History

Anna Hazare agitation against the Lokpal Bill ended April 9th ​​History

Follow Us
Close
Follow Us:

अहिंसेचा इतिहास असलेल्या भारतामध्ये 2011 साली अशाच एका आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांचे आंदोलन. अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी केलेले उपोषण देशभरात मोठ्या आंदोलनाचे रूप धारण झाले होते. २०११ साली भ्रष्टाचाराविरोधात कठोर कायदा लागू करावा, या मागणीसाठी त्यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि हजारो नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. सरकारशी अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर तडजोड झाली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले आणि लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. (Dinvishesh) त्यामुळे हे आंदोलन भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जाते. आजच्या दिवशी सरकारने अटी मान्य केल्यामुळे आण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले.

09 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1860: फ्रेंच प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि शोधक एडवर्ड-लिओन स्कॉट डी मार्टिनविले यांनी मानवी आवाजाचे पहिले रेकॉर्डिंग केले.
  • 1867: रशियाकडून अलास्काचा प्रदेश विकत घेण्याच्या प्रस्तावाला युनायटेड स्टेट्समध्ये मंजुरी देण्यात आली.
  • 1940: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे आणि डेन्मार्कवर आक्रमण केले.
  • 1953: वॉर्नर ब्रदर्सचा पहिला 3D चित्रपट हाऊस ऑफ वॅक्स रिलीज झाला.
  • 1967 : बोइंग-767 या विमानाने पहिले उड्डाण केले.
  • 1991 : जॉर्जियाने सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1994 : सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी, शास्त्रज्ञ पी.एम. भार्गव यांना आर.डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1995 : लता मंगेशकर यांना अवधारत्न आणि साहू सूरणमनामने सन्मानित करण्यात आले.
  • 2005 : प्रिन्स चार्ल्सने कॅमिला पार्कर-बोल्सशी लग्न केले
  • 2011 : प्रख्यात भारतीय समाजसेवक अण्णा हजारे दिल्ली येथे लोकपाल बील कायदा पास करण्यासठी करीत असलेले आमरण उपोषण सरकारने आपली मागणी मान्य केल्यानंतर बंद केले.
हे देखील वाचा : सुजय विखेंना उच्च न्यायालयाचा धक्का; निलेश लंकेंची खासदारकी कायम, निवडणूक याचिका फेटाळली

09 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष

  • 1336 : ‘मंगोल सरदार तैमूरलंग’ – यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1405)
  • 1770 : ‘थॉमस योहान सीबेक’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1828 : ‘गणेश वासुदेव जोशी’ – थोर समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 25 जुलै 1880)
  • 1887 : ‘विष्णू गंगाधर केतकर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1950)
  • 1893 : ‘राहुल सांकृत्यायन’ – बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 एप्रिल 1963)
  • 1925 : ‘लिंडा गुडमन’ – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑक्टोबर 1995)
  • 1930 : ‘एफ. अल्बर्ट कॉटन’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1948 : ‘जया भादुरी’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
हे देखील वाचा : साहित्याचा सूर्योदय ते चित्रपटसृष्टीचा महानायक घडवणारा किमयागार! जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व!

09 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष

  • 585 इ.स. पूर्व : ‘सम्राट जिम्मू’ – जपानचा पहिला सम्राट यांचे निधन.
  • 1626 : ‘सर फ्रँन्सिस बेकन’ – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1561)
  • 1695 : पंडितकवी ‘वामनपंडित’ यांनी समाधी घेतली.
  • 1994 : ‘चंद्र राजेश्वर राव’ – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म: 22 जून 1908)
  • 2001 : ‘बेहराम काँट्रॅक्टर’ – पत्रकार आणि स्तंभलेखक यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1930)
  • 2001 : ‘शंकरराव खरात’ – दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1921)
  • 2009 : ‘शक्ती सामंत’ – हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते यांचे निधन. (जन्म: 13 जानेवारी 1926)
  • 2009 : ‘अशोकजी परांजपे’ – लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार यांचे निधन.

Web Title: Anna hazare agitation against the lokpal bill ended april 9th history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

देशासाठी स्वाभिमानाने फासावर चढणारे, शहीद मंगल पांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 08 एप्रिलचा इतिहास
1

देशासाठी स्वाभिमानाने फासावर चढणारे, शहीद मंगल पांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 08 एप्रिलचा इतिहास

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास
2

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल
3

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास
4

स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शाहिस्ता खानची महाराजांनी छाटली बोटं; जाणून घ्या 05 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.