
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात संघाने भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केले आहे. त्यामुळे बहरताने जवळपास ही मालिका गमावली आहे. आयर्लंड दौऱ्याआधी सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर ही जबाबदारी श्रेयस अय्यरवर सोपविण्यात आली. मात्र त्याला 5 सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. दरम्यान आदिल रशीदने कोणता विक्रम केला आहे. ते जाणून घेऊयात.
कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या होता. यामुळे आदिल रशीद इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल
आदिल रशीद इंग्लंडचा अत्यंत महत्वाचा असा गोलंदाज आहे. इंग्लंडला अनेक सामन्यात त्याने विजय मिळवून दिला आहे. आदिल रशीदच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 166 विकेट्स झाल्या आहेत. आदिल रशीद दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर राशीद खान आहे. ज्याच्या नावावर 193 विकेट्स आहेत.
भारताचा दारूण पराभव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने हा सामना १२५ धावांनी जिंकला. या विजयासह त्यांनी मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
आयर्लंड दौऱ्यापासून सुरू असलेली भारतीय संघाची पराभवाची मालिका थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या सामन्यात भारतीय संघाने गोलंदाजीपासून फलंदाजीपर्यंत प्रत्येक बाबतीत निराशा केली.
भारतीय संघाची खराब कामगिरी ही मोठ्या चिंतेची बाब बनली आहे. इतकेच नाही तर, श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदावर आणि भारतीय प्रशिक्षक संघावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विश्वविजेत्या संघाची अशी अवस्था चाहत्यांच्या आकलनापलीकडची आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी, २०१९ मध्ये वेलिंग्टन येथे न्यूझीलंडकडून भारतीय संघाला ८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.