आशिया कप 2025 चा थरार (Asia Cup 2025) आज (9 सप्टेंबर) पासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल. त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने स्पष्ट केले आहे की, आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात त्यांचा संघ आपल्या आक्रमक पवित्र्यापासून अजिबात मागे हटणार नाही. भारतीय संघाचे आशिया कप अभियान बुधवार, 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जेव्हा संघ ग्रुप-ए मधील आपल्या पहिल्या सामन्यात युएई संघाशी भिडेल. त्यानंतर, रविवार, 14 सप्टेंबर रोजी बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना होईल. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
स्पर्धेच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला की, “आक्रमकता नेहमी मैदानात असते आणि जिंकण्यासाठी ती खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला जिंकायचे असेल, तर आक्रमकतेशिवाय काम चालणार नाही.” सूर्यकुमारने हे देखील सांगितले की, त्याच्या संघातील वातावरण सकारात्मक असून, खेळाडूंनी जोरदार तयारी केली आहे. “आम्ही काही चांगले सराव सत्र केले आहेत. आशिया कपमधील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळणे एक मोठे आव्हान असेल,” असेही तो म्हणाला.
Salman Ali Agha and Suryakumar Yadav responded to the question related to holding their temper and aggression on ground considering the situation between two countries.
VC: ACC#Cricket | #Pakistan | #SalmanAliAgha | #SuryakumarYadav | #Sharjah | #India pic.twitter.com/Gi5mXjxKnP
— Khel Shel (@khelshel) September 9, 2025
सूर्यकुमारच्या या विधानानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने आक्रमकतेवर आपली प्रतिक्रिया दिली. “जर कोणाला आक्रमक व्हायचे असेल, तर तो त्याचा निर्णय आहे,” असे तो म्हणाला. त्याने सांगितले की, तो आपल्या कोणत्याही खेळाडूला याबद्दल विशेष सूचना देत नाही.
आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
युएई या स्पर्धेत ‘अंडरडॉग’ (अपेक्षित विजय न मिळवणारा) मानला जात असला, तरी सूर्यकुमारने त्यांना हलक्यात घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, “युएई उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे आणि त्यांनी नुकत्याच झालेल्या टी-20 ट्राय-सिरीजमध्ये काही सामने जिंकले आहेत. मला आशा आहे की ते आशिया कपमध्येही चांगली कामगिरी करतील.”
जेव्हा सूर्याला विचारले की भारत सुरुवातीच्या सामन्यात काही प्रयोग करेल का, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. “जेव्हा तुम्ही कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळता, तेव्हा तुम्हाला तुमच्या तयारीची पातळी माहीत असते. जर एखाद्या गोष्टीमुळे आम्हाला चांगले निकाल मिळत असतील, तर त्यात बदल का करायचा? जी पद्धत काम करत आहे, त्यात बदल करण्याची गरज नाहीये,” असे तो म्हणाला.
Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ
आशिया कप 2025साठी भारतीय संघ: