बीसीसीआयने टीम इंडियाबाबत घेतला मोठा निर्णय (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्याच्या काही तास आधी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर विविध देशांच्या ध्वजांमध्ये भारतीय ध्वज ‘तिरंगा’ नसल्यामुळे निर्माण झालेला वाद अधिकच तीव्र होत चालला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या VIDEO आणि त्यानंतर सर्व स्तरांतून होणाऱ्या टीकेदरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण जारी केले आहे.
पाकिस्तानने स्वस्त सबबींचा आधार
PCB ने स्पष्ट केले आहे की, त्यांनी फक्त त्या देशांचे झेंडे लावले आहेत जे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळतील. PCB च्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, भारत स्पर्धेतील सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, त्यामुळे त्यांचा ध्वज फडकवण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे, बांगलादेश संघही आपला पहिला सामना दुबईमध्ये खेळणार आहे, त्यामुळे त्यांचा ध्वजही फडकवण्यात आलेला नाही.
सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकताना फक्त भारताचा झेंडा नाही
No Indian flag in Karachi: As only the Indian team faced security issues in Pakistan and refused to play Champions Trophy matches in Pakistan, the PCB removed the Indian flag from the Karachi stadium while keeping the flags of the other guest playing nations. pic.twitter.com/rjM9LcWQXs — Arsalan (@Arslan1245) February 16, 2025
संपूर्ण वाद काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे झेंडे दिसत आहेत, परंतु भारतीय ध्वज गायब आहे. ही स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये सुरू होत आहे. सोशल मीडियावर, चाहत्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) त्यांच्या स्टेडियममध्ये जाणूनबुजून भारतीय ध्वज फडकवत नसल्याचा आरोप केला.
ही खोटी बातमी आहे- PCB
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वादाचे वर्णन सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बनावट बातम्यांचा भाग म्हणून केले आहे. PCB चे म्हणणे आहे की काही लोक जाणूनबुजून पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. PCBने असेही म्हटले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, पाकिस्तानच्या शहरांमधील मुख्य रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांवर भारतासह सर्व खेळणाऱ्या देशांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी आठ वर्षांनी होत आहे. पाकिस्तान त्याचा गतविजेता आहे. २०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता.






