
हार्दिक आणि सूर्यकुमारच्या मैत्रीत वितुष्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मुंबई इंडियन्सला उतरती कळा
पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरी झाली होती. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली सलग दुसऱ्यांदा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. स्पर्धा संपल्यानंतर हे स्पष्ट झाले की, कर्णधार हार्दिक पांड्याला सूर्यासह संघातील वरिष्ठ खेळाडूंचा पाठिंबा नव्हता. आता या दोघांनी सोशल मीडियावर आपली मैत्री संपवल्यामुळे, हे स्पष्ट झाले आहे की मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक आणि सूर्या यांचे एकमेकांशी पटत नव्हते. दरम्यान सूर्यकुमारही यावर्षी फॉर्ममध्ये नाही आणि हार्दिक पांड्यालाही अनेक वेळा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे.
IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची जादू ‘अपयशी’, केवळ 14 धावांवर आऊट; चाहते नाराज
सूर्याकडून टीम इंडियाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले
मुंबई इंडियन्स आणि हार्दिक याच्यासोबतच सूर्यकुमार यादवलाही टीम इंडियामधून वगळण्यात आल्याने तो सध्या चर्चेत आहे. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्याचा भारतीय संघात समावेश नव्हता. इतकेच नाही, तर त्याने आपले कर्णधारपदही गमावले आहे. यावर्षी आपल्या कर्णधारपदाखाली सूर्याने टीम इंडियाला टी-२० विश्वचषकापर्यंत पोहोचवले होते. आता श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सूर्या आणि हार्दिक यांच्यातील मतभेदांमागे काय कारण असू शकते?
हार्दिक आणि सूर्या यांच्यातील मतभेदांमागे अनेक कारणे असू शकतात. टीम इंडियाचे कर्णधारपद हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. जेव्हा रोहित शर्माने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर निवृत्ती घेतली, तेव्हा हार्दिक पांड्याचे नावही नवीन कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. त्यावेळी हार्दिक संघाचा उपकर्णधारही होता. त्याने रोहितच्या आधीही संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि टी-२० मध्ये त्याला दीर्घकाळ कर्णधार म्हणून कायम ठेवण्याची योजना होती. मात्र, दुखापतीमुळे तो संघात सतत आत-बाहेर होत होता, ज्यामुळे निवड समितीला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध घ्यावा लागला.
२०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर, जेव्हा रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न आला, तेव्हा हार्दिक एक प्रमुख दावेदार होता. मात्र, रोहित शर्माच्या सल्ल्यानुसार सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले. सूर्याच्या कर्णधारपदाखाली संघाने चांगली कामगिरी केली, पण टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आपली निवड न झाल्याने हार्दिकच्या मनात काही प्रमाणात नाराजी नक्कीच असणार असा कयास बांधला जात आहे. त्याला सूर्याच्या कर्णधारपदाखाली भारतासाठी खेळावे लागले. दरम्यान, आयपीएलमध्ये हार्दिक कर्णधार होता आणि सूर्या त्याच्या नेतृत्वाखाली खेळला. परिणामी, कर्णधारपदावरून झालेल्या या संघर्षामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये दुरावा निर्माण झाला असावा. मैदानावरही अनेकदा या दोघांना एकमेकांपासूनच दूरच पाहण्यात आले आहे आणि त्याचाच फटका मुंबई इंडियन्सला भोगावा लागला असणार असंही आता चाहते म्हणत आहेत.