फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा एकदिवसीय सामना : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या पाच सामान्यांचे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला होता तर आज दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिनी टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये १-१ अशी मालिकेमध्ये बरोबरी झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. यामध्ये आज भारताचा संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली आज दुसऱ्या एकदिवसीय सामान्यसाठी मैदानात उतरला होता.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाचा आज मालिकेतील दुसरा सामना झाला. यामध्ये टीम इंडियाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतीय महिला संघासमोर ३७२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. परंतु भारताच्या संघ हे लक्ष्य पूर्ण करण्यात अपयशी ठरला.
IND vs AUS : भारताच्या संघाने सामना गमावला! मालिकेत बरोबरी, 10 विकेट्सने मिळवला विजय
आजच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमालीची सुरुवात करून दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांचा घाम गाळला. फोबी लिचफिल्ड तीन संघासाठी ६० धावांची खेळी खेळली तर जॉर्जिया पूर्ण हिने शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाची दमदार खेळाडू एलिस पेरीने शतक ठोकून इतिहास रचला. एलिस पेरीने संघासाठी १०५ धावांची खेळी खेळली. बेथ मूनीने सुद्धा संघासाठी कमालीची कामगिरी करत ५६ धावांची खेळी खेळली.
Win for Australia in the 2nd #AUSvIND ODI!
The third & final match of the series to be played on December 11 in Perth.
Scorecard ▶️ https://t.co/gRsQoSo5LR #TeamIndia pic.twitter.com/Q9KDFjbSFH
— BCCI Women (@BCCIWomen) December 8, 2024
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर स्मृती मानधनाने फक्त ९ धावांची खेळी खेळली आणि विकेट गमावला. तर रिचा घोषने संघासाठी अर्धशतक ठोकून ५६ धावांची खेळी खेळली. हरलीन देओलने संघासाठी फक्त १२ धावा केल्या. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघासाठी ३८ धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर जेमिमा रॉड्रिक्सने संघासाठी ४३ धावा केल्या. दीप्ती शर्मा १० धावा करून बाद झाली. मैन्नु मानीने संघातही ४६ धावांची खेळी खेळली परंतु एवढ्या धावा टीम इंडियाच्या विजयासाठी पुरेशा नव्हत्या आणि टीम इंडियाने लवकर विकेट गमावल्यामुळे भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने १२२ धावांनी पराभूत केले.
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर साईमा ठाकोरने ३ विकेट्स नावावर केले. तर मैन्नु मानीने संघासाठी २ विकेट्स घेतले. रेणुका ठाकूर, दीप्ती शर्मा, प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी १ विकेट नावावर केला.