ही मालिका प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाची असेल. यातून कसोटी क्रिकेटमधील त्यांचे भविष्य ठरू शकते. गंभीर यांच्या कार्यकाळात, भारत व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि टी-२० विश्वचषकातील विजेतेपद मिळवले आहे मात्र, कसोटी क्रिकेटमधील परिस्थिती खूपच निराशाजनक आहे. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाने WTC अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या सायकलमध्ये भारताला नऊ कसोटी सामने खेळायचे आहेत आणि त्यापैकी जवळपास सर्वच सामने जिंकणे आवश्यक आहे.
गॉलमधील आकडेवारीनुसार, १९९८ पासून येथे खेळल्या गेलेल्या ४९ कसोटी सामन्यांपैकी श्रीलंकेने २७ सामने जिंकले आहेत. या वर्चस्वात फिरकी गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली आहे. मुथय्या मुरलीधरन आणि रंगना हेराथ यांच्या फिरकरीच्या जादूने श्रीलंकेने या मैदानात वर्चस्व गाजवले आहे. परंतु त्यांच्याकडे अजूनही प्रभात जयसूर्या आणि रमेश मेंडिस यांच्यासारखे फिरकी गोलंदाज आहेत, ज्यांनी गॉलला आपला बालेकिल्ला बनवले आहे.
या दोन मधल्या फळीतील फलंदाजांची श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांविरुद्धची कामगिरी या कसोटीत निर्णायक ठरेल. सराव सामन्यात चांगली फलंदाजी न करूनही, सरफराज खानऐवजी जुरेलला पसंती दिली जाऊ शकते. भारताला केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल या पहिल्या तीन फलंदाजांकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. परंतु, गिल हा संघाच्या फलंदाजीचा मुख्य आधार असेल. साई सुदर्शनच्या दुखापतीनंतर पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावरील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. त्याने सराव सामन्यात शतकही झळकावले होते. गॉलमध्ये एक चांगली खेळी करून, पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावरील आपला दावा अधिक मजबूत करण्याची सुवर्णसंधी आहे.
भारत कुलदीप यादव, मानव सुथार आणि रवींद्र जडेजा या तीन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांनी गुरुवारी याचे संकेत दिले होते, की तीन डावखुरे फिरकी गोलंदाज मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गॉलची खेळपट्टी फंलदाजीसाठी तितकी सोपी असणार नाही. सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकी गोलंदाजांना या मैदानावर मदत मिळू शकते.
या खेळपट्टीवर बहुतांश जबाबदारी फिरकी गोलंदाजांवर असेल, परंतु प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावरी मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु, गुरनूर ब्रारनेही अलीकडे व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रविचंद्रन अश्विनने प्रसिद्धऐवजी गुरनूरला पसंती दिली, परंतु प्रसिद्धच्या अनुभवामुळे त्याला प्राधान्य दिले जाऊ शकते. मात्र, कर्णधार शुभमन गिलने यावर मौन बाळगले आहे. त्याने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सामन्याच्या दिवशी निर्णय घेतला जाईल.
भारताचे संभाव्य प्लेइंग 11: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल/सरांश जैन/सरफराज खान, रवींद्र जडेजा, मानव सुथार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा/गुरनूर ब्रार.

