
photo- social media
१८१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या तीन ओव्हरमध्ये डॅनी वायट-हॉज आणि सोफिया डंकली बाद झाल्या. त्यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या ओवहेहरमध्ये एमी जोन्स बाद झाली, त्यामुळे संघाने अवघ्या ३५ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, एलीस कॅप्सीने आणि हीथर नाइटने यांनी चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करत सामना भारताच्या हातातून काढून घेतला. अॅलिस कॅप्सीने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ८२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिने २६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, हेदर नाईटनेही महत्वपूर्ण खेळी खेळत ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा केल्या. दोन्ही फलंदाजांनी फिरकी आणि वेगवान गोलंदाजीविरुद्ध अथक आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे इंग्लंडने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली होती. शफाली वर्मा ११ धावांवर बाद झाली, तर स्मृती मंधाना चार्ली डीनच्या गोलंदाजीवर एलबीडब्ल्यू (LBW) झाली. त्यानंतर यास्तिका भाटियाने वेगवान खेळी करून भारताची सूत्रे हाती घेतली. तिने पॉवरप्लेमध्ये ७ चौकार मारून धावगती कायम ठेवली, पण ३२ धावांवर धावबाद झाली. मधल्या फळीत जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. लॉरेन बेलच्या स्लोअर बॉलवर बोल्ड झाल्यामुळे जेमिमाला आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. हरमनप्रीतने एक बाजू सांभाळत नाबाद ५६ धावा केल्या. मात्र, भारतीय संघ शेवटच्या पाच ओव्हरमध्ये केवळ ४८ धावाच जोडू शकला, ज्याचा अंतिम धावसंख्येवर स्पष्ट परिणाम झाला. भारताने आपल्या निर्धारित २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या.
१२ जूनपासून सुरू होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण होती. भारताने संपूर्ण मालिकेत चांगला क्रिकेट खेळला, पण निर्णायक सामन्यात दबावाखाली इंग्लंडने उत्तम कामगिरी करत मालिका जिंकली. त्यामुले विश्वचषकाआधी भारतीय संघाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
IND vs AFG: रोहित – हार्दिकच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह, अफगाणिस्ताविरूद्ध खेळणार नाही RO-KO?