
भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये आज शेवटचा टी-20 सामना
भारत आणि इंग्लंडचा संघ 1-1 बरोबरीत
भारतीय महिला संघ विजयाच्या विश्वासाने मैदानात उतरणार
Indian Vs England Womens T-20 Match: आयपीएलचा ठरत संपताच लवकर महिला टी20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. हा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार आहे. दरम्यान त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळत आहे. त्यातील शेवटचा सामना होणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज पार पडणार आहे. भारतीय संघ आणि इंग्लंडचा संघाने प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ ही मालिका जिंकणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघ आज इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज मध्यरात्री ११:०० वाजता सुरू होणार आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली होती. तिच्या अनुपस्थितीत स्मृती मंधानाने संघाचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीतने संघात पुनरागमन केले, मात्र तिला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते.
लक्ष फक्त Women’s T20 World Cup कडे: भारतीय महिला संघ इंग्लंडला रवाना; 14 जूनला महामुकाबला
लवकरच महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 12 जूनपासून स्पर्धा सुरू होईल. ही स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका महत्वाची समजली जात आहे. वर्ल्ड कप सुरू होण्याआधी ही महत्त्वाची मालिका असल्याने भारतीय फलंदाजांना आपल्या फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे.
सामना कुठे पाहू शकाल?
भारत विरुद्ध इंग्लंडविरुद्धचा हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइलवर हा सामना सोनी लिव या ॲपवर लाईव्ह स्ट्रीम केला जाणार आहे.
ICC Women’s T20 World Cup 2026: “… ही तर केवळ सुरुवात”; हरमनप्रीत कौरने केले मोठे विधान
काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
2025 च्या वर्ल्डकप जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण होता. ही तर केवळ सुरुवात आहे. या विजयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. आम्ही आता विजयाची सवय लावून घेतली आहे. हा विजय केवळ एक ध्येय नव्हते. तर भारतीय महिला क्रिकेटच्या एका नव्या युगाची सुरुवात आहे.