आयपीएल ट्रॉफी(फोटो-सोशल मीडिया)
IPL suspended : भारत आणि पाकिस्तान या दोन देशात तणाव वाढला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जोरदार उत्तर दिले जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याकडून प्रथम ७ मे रोजी ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर ८ मे च्या रात्री पाकिस्तानचे रावळपिंडी स्टेडियम उध्वस्त करण्यात आले आहे. या दरम्यान त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२५ ची पाकिस्तान सुपर लीग यूएईमध्ये हलवण्यात आले आहे. या पाठोपाठ आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. भारतात सुरू असलेली आयपीएल २०२५ बीसीसीआयकडून स्थगित करण्यात आली आहे.
🚨 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🚨
IPL 2025 is suspended until further notice.
New dates & venues are being reviewed — remaining matches may be rescheduled soon.
Nation First. Safety Always. 🇮🇳#IPL2025 | #IPl | #IndiaPakistanWar pic.twitter.com/3pprpXNZ2p
— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. ८ मे रोजी पाकिस्तानने भारतावर अनेक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारताने हाणून पाडले आहे. परंतु, खबरदारी म्हणून, गेल्या गुरुवारी धर्मशाळेत खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अर्ध्यावर थांबवण्यात आला होता. त्यानंतर आयपीएल रद्द होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर बीसीसीआयने सध्याची परिस्थिति बघता आयपीएल रद्द करण्यात आली आहे.
या बाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “देशात युद्ध सुरू असताना क्रिकेट सुरू असणे, हे चांगले दिसत नाही.” बीसीसीआयने आयपीएल संघांनाही स्थगितीबाबत माहिती दिली आहे. लवकरच बोर्डाकडून माध्यमांसाठी अधिकृत निवेदन जारी करण्यात येऊ शकते.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी नियोजित करण्यात आला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ विजेतेपदाच्या शर्यतीत होते. परंतु पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या, बीसीसीआय परदेशी खेळाडूंना सुरक्षितपणे त्यांच्या देशात कसे परत पाठवता येईल यावर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे.