(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने RCB बाबत एक मोठं भाकीत केलं आहे. हा तोच संघ आहे ज्याने १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आपला पहिलेवहिला विजेतेपद कप जिंकला आहे. अश्विनचा असा विश्वास आहे की, RCB ची सध्याची संघरचना इतकी बॅलंस आहे की, पुढील दोन वर्षांत ते आपल्या नावावर आणखी दोन विजेतेपदं जमा करू शकतात.
YouTube वाहिनीवर बोलताना, अश्विनने RCB च्या या नवीन आणि बॅलंज संघाबाबत भरभरून कौतुक केले. अश्विन म्हणाला, “या संघासह, RCB पुढील दोन वर्षांत आपल्या विजेतेपदांच्या यादीत आणखी एका विजेतेपदाची भर घालू शकते. IPL जिंकणे ही काही सोपी गोष्ट नाही; परंतु या संघाकडे असलेले भक्कम पायाभूत रचना आहे. प्रत्येक स्थानासाठी या संघाकडे तितकेच सक्षम पर्याय (like-for-like replacements) आहेत. जे त्या जागेसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी त्यांच्या बँटिंग ऑर्डरमधील उणीवा नव्या खेळाडूंनी भरुन काढल्या आहेत. ज्यामुळे हा संघ आता अत्यंत बलाढ्य, मजबूत आणि गुणतालिकेत अव्वल दोन स्थानांमध्ये स्थान मिळवण्यास सक्षम दावेदार बनला आहे. “
IPL २०२४ नंतर, RCB ने केवळ विराट कोहली, यश दयाल आणि रजत पाटीदार यांनाच संघात कायम (Retain) ठेवण्याचा एक मोठा धोका पत्करला. मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मुक्त केल्यानंतर, २०२५ च्या मेगा लिलावादरम्यान संघात मोठे बदल करण्यात आले. फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवुड, टीम डेव्हिड आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या खेळाडूंच्या आगमनामुळे संघाला समतोल मिळाला. ज्यामुळे त्यांना मागील हंगामात विजेतेपदाचा माजलेला दुष्काळ संपवण्यात यश आलं.
RCB आपल्या मोहिमेची सुरुवात २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध करणार आहे; मात्र, जोश हेझलवुडच्या सामना खेळणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. हेझलवुड सध्या दुखापतीतून सावरत असून, त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्याचा परिणास संघावर नक्कीच होणार आहे. पण अश्विन मात्र या परिस्थितीकडे RCB साठी एक ‘छुपं वरदाना’मानतो. तो म्हणाला, “जर हेझलवुड उपलब्ध नसेल, तर RCB फिल सॉल्ट आणि जेकब बेथेल या दोघांनाही संघात स्थान देऊ शकते. हेझलवुड संघात परत येईपर्यंत, संघाची स्थिती आणखीनच स्पष्ट झालेली असेल.”






