Maharashtra State Council of Examination यांनी केंद्र प्रमुख परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर केला. महाटीईटी/सीटीईटी माहिती भरण्याची मुदत १६–२१ मार्चवरून वाढवून २२–३१ मार्च २०२६ करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयानुसार सर्व शिक्षकांना ३० ऑगस्ट २०२७ पर्यंत टीईटीपरीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये इंग्रजी भाषेची सक्ती करण्याचा विचार केला जात आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. शिक्षकांच्या आंदोलनाची झळ विद्यार्थ्यांना बसत आहे. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनानंतर पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवर्गामध्ये गोंधळ निर्माण झाला
२०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भूमिका बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षक सभेने मांडली आहे.
राज्यात तब्बल ८० हजार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून शिक्षकांनी पूर्वी नियुक्त झालेल्यांसाठी टीईटी सक्ती रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे.
राज्यातील टीईटी परीक्षेच्या पारदर्शकता, गोपनीयता आणि एकूणच विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हजारो परिक्षार्थींच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महा-TET परीक्षेत ४,७५,६६९ पैकी ४,४६,७३० उमेदवार उपस्थित राहून ९३.९१% उपस्थितीची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील दोन केंद्रांत आठ उमेदवार गैरप्रकार करताना पकडले; समवेक्षकांवर चौकशीची कारवाई.
परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक परिरक्षक तसेच प्रत्येक केंद्रावर परीक्षा केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली होती.
महाटीईटी २०२५ परीक्षा रविवारी वाशिममधील २२ केंद्रांवर दोन सत्रांत होणार असून सुरक्षेसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
राज्यात टीईटी परीक्षा सक्तीबाबत निर्णय न घेतल्याने शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत परीक्षा सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
कार्यरत शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे.गोंदिया जिल्ह्यातील हजारो शिक्षक टीईटी परीक्षा देण्यासाठी सज्ज आहेत. २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी गोंदिया मुख्यालयात १७ परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येत आहे
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिक्षण क्षेत्रातील शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे.
शाळा संपताच संध्याकाळी ऑनलाईन क्लासेस, टेस्ट सीरीज आणि नोट्स तयार करण्यात त्यांचा दिवस जातो. या परीक्षेचा निकाल भविष्यातील शिक्षक भरतीवर थेट परिणाम करणार असल्याने 'गुरुजींची परीक्षा' ही सर्वांसाठीच महत्त्वाची ठरणार…
शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र ठरवले असले, तरी त्यांना टीईटी पात्र असणे आवश्यक आहे. यामुळे यंदा टीईटीला बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.