भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने येथे प्रतिष्ठा पणाला लावली असून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. गराडे आणि दिवे गणातही तिन्ही प्रमुख पक्ष आमनेसामने उभे ठाकल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटात मात्र यंदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला.
उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करत अधिकृत उमेदवारी मिळवली. या एका निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून वीर गटात पंचरंगी लढत उभी राहिली आहे. भिवडी व वीर गणात अनेक उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.बेलसर, माळशिरस आणि निरा परिसरातही राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
माळशिरस गणात प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याने बहुरंगी लढत रंगली आहे. बेलसर गटात उमेदवारी नाकारल्यानंतर झालेल्या पक्षांतरांमुळे पारंपरिक गणिते मोडीत, सत्तेच्या वर्चस्वाची लढाई एकूणच पुरंदर तालुक्यातील ही निवडणूक केवळ जागांची नाही, तर सत्तेच्या वर्चस्वाची बनली आहे. बंडखोरी आणि पक्षांतरांनी पारंपरिक राजकीय गणिते मोडीत निघाली असून, या रणधुमाळीचा निकाल मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीला फटका बसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावे या भागात येत असल्याने विकास, पुनर्वसन आणि भरपाईचे मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी आले आहेत.निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चौरंगी लढत होत आहे. निरा-शिवतक्रार व कोळविहिरे गणातही प्रत्येक मत निर्णायक ठरण्याची शक्यता असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.






