India Bangladesh relations 2026 : बांगलादेशने भारताला त्याच्या ५६ व्या स्वातंत्र्यदिनी सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. ढाका भारताच्या हिताच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
Bangladesh Genocide Day : बांगलादेश दरवर्षी २५ मार्च रोजी नरसंहार दिन साजरा करतो. १९७१ साली याच दिवशी, पाकिस्तानी सैन्याने 'ऑपरेशन सर्चलाइट'च्या नावाखाली निःशस्त्र नागरिकांची कत्तल केली होती.
CPDने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, बांगलादेश या करारांतर्गत सुमारे ४,५०० अमेरिकन उत्पादनांना ताबडतोब शुल्कमुक्त प्रवेश देईल, तर पुढील पाच ते १० वर्षांत आणखी २,२१० उत्पादन श्रेणींना शुल्कमुक्त वागणूक मिळण्याची अपेक्षा.
पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारताच भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायोगाने भारतीय नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे.
बांगलादेशातील नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारचा घटनादुरुस्तीचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत, कोणत्याही परिषदेचे नव्हे, अशी भूमिका घेतली.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने १३ देशांच्या सरकारांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या निकालांनी माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाल्याचे निश्चित केले आहे. BNP चा विजय देखील भारतासाठी एक स्वागतार्ह बातमी आहे.
पंतप्रधान शेख हसीना देश सोडून गेल्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी झालेली ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीत मुख्य लढत ही बीएनपी आणि जमात-ए-इस्लामी यांच्यात झाल्याचे दिसून आले.