Indigo Flight Crisis: इंडिगोच्या सीईओंनी अलिकडच्या काळात झालेल्या उड्डाण विलंब आणि व्यत्ययाबद्दल प्रवाशांची माफी मागितली. त्यांनी सामान्य सेवा पूर्ववत करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांची रूपरेषा दिली.
विमानांचे कामकाज स्थिर होत आहे. तसेच सुरक्षा उत्तम आहे, प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यापासून देशभरातील विमानतळांवर मोठा गोंधळ उडाला आहे. इंडिगोला नवीन डीजीसीए नियमांनुसार त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करता आले नाही, ज्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.
इंडिगोची विमाने आरडीएस झाल्याचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FDTL म्हणजे काय? विमान तळावरील नवीन नियमांमुळे इंडिगो या देशातील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीला मोठा फटका बसला आहे. या कंपनीची वाहतूक शेवा पूर्णपणे कोलमडून पडली होती.