वारंवार घसा कोरडा पडतो? आरोग्यासंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजाराचा धोका
मधुमेहाची लक्षणे कोणती?
वारंवार घसा कशामुळे कोरडा पडतो?
शरीरात पाण्याची कमतरता कशामुळे निर्माण होते?
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याचे ऊन पडत आहे. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त तहान लागते आणि शरीरात थकवा जाणवू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात कोणत्याही वेळी आणि कधीही तहान लागते. तहान लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे. तहान लागल्यानंतर पाणी प्यायले जाते. पण पाणी पिऊन सुद्धा तुम्हाला जर सतत तहान लागत असेल तर हे आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या छोट्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण सायलेंट किलर आजाराची लक्षणे लवकर दिसून येत नाही. हेच छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात. चला तर जाणून घेऊया पुन्हा पुन्हा तहान लागणे आणि घसा कोरडा पडणे कोणत्या आजाराचे संकेत आहेत.(फोटो सौजन्य – istock)
तरुण वयात Breast Cancer होण्यास कारणीभूत ठरतात ‘ही’ गंभीर कारणे, स्तनात गाठी होऊ नये आहारात करा बदल
तहान लागणे ही नैसर्गिक क्रिया असली तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तहान लागणे हे शरीरसंबंधित धोक्याचे लक्षण आहे. शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तहान लागते, असे सगळ्यांचं वाटते. पण सतत तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. चुकीची जीवनशैली आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. मधुमेह झाल्यानंतर वारंवार लघवीला गेल्यामुळे शरीरातील पाणी आणि क्षाराची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन सतत तहान लागते. कितीही पाणी प्यायले तरीसुद्धा तहान लवकर जात नाही.
किडनीला शरीरातील जास्तीची शुगर फिल्टर करण्यासाठी जास्त वेळ लागतो, तेव्हा सतत लघवीला जावे लागते. जास्त वेळा लघवीला गेल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन वाढून पाण्याची पातळी कमी होऊन जाते. काहीवेळा पुन्हा तहान लागल्यानंतर तोंड आणि घसा कोरडा पडून जातो. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच योग्य उपचार करावेत. तसेच ३ महिन्यातून एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासावी.
मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. ही लक्षणे कालांतराने वाढतात आणि शरीर आतून पोखरून टाकतात. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सतत तहान लागणे किंवा लघवीला होणे अशी लक्षणे दिसू लागतात. पण लक्षणांकडे वाढ झाल्यानंतर जखमा लवकर न भरणे, जखमा चिघळून जाणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. मधुमेहावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे.
Ans: खूप तहान लागणे आणि कोरडे तोंड होणे.वारंवार लघवी होणे.
Ans: साखर, मैदा, प्रक्रिया केलेले अन्न टाळा. फायबरयुक्त आहार, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा.
Ans: अनियंत्रित साखरेमुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, किडनी निकामी होणे आणि डोळ्यांचे विकार (दृष्टी जाणे) होऊ शकतात.






