नीतीश कुमार हे आज राज्यसभेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर येत्या 14 एप्रिल रोजी ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती.
राज्यसभेमध्ये 19 सदस्यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. यामध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्हीलचेअरवरुन संसदेमध्ये येत शपथ घेतली. त्यांची ही जिद्द आणि चिकाटी याचे सर्वांनी कौतुक केले.
२०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ३३ टक्के महिला आरक्षण स्थापित करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या वाढवून 816 करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये भाषण करणार आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धपरिस्थितीवर ते भारताची भूमिका आणि परिस्थिती मांडणार आहेत.
विरोधक मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर महाभियोग आणण्याची तयारी करत आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये यावर चर्चा सुरू आहे. महाभियोग प्रस्तावाच्या सूचनेवर २०० हून अधिक खासदारांनी स्वाक्षरी केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये भूमिका मांडली आहे. त्यांनी भारतीय नागरिकांना सुरक्षित देशामध्ये परत आणणे हे प्राधान्य असल्याचे सांगितले.
BJP Rajya Sabha Candidates List News: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील चौघांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक तोंडावर आली असून, महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे सहा उमेदवार निवडून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली.
काँग्रेसची ही कृती त्यांच्या शीखांबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतिबिंब असून, लोकांचा अपमान करणे हा त्या पक्षाच्या राजकीय संस्कृतीचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर सडकून टीका केली. भ्रष्टाचार, दारू घोटाळा आणि जुन्या काळातील संशयास्पद 'डील्स'वरून त्यांनी काँग्रेस आणि 'आप'ला धारेवर धरले.
सरन्यायाधीश पदावर कार्यरत असताना भूषण गवई हे ३३० पेक्षा जास्त निर्णयांमध्ये समाविष्ट होते. त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्ह्णून १४ मी रोजी पदभार स्वीकारला होता.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चा सत्रामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. मात्र त्यांनी केवळ लोकसभेमध्ये भाषण केले. राज्यसभेमध्ये जाणे त्यांनी टाळले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ७८२ सदस्यांपैकी विजयासाठी ३९४ मते आवश्यक आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सध्या लोकसभेत २९३ आणि राज्यसभेत १२९ खासदारांचा पाठिंबा आहे.