भारत हा आपल्या ऐतिहासिक वस्तू, त्यांचा इतिहास आणि त्यातील रहस्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. देशात अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत, ज्यांचा इतिहास किंवा रहस्ये ऐकून आपण आवाक् होतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एक किल्ल्याची रहस्याने भरलेली गोष्ट सांगणार आहोत. मध्य प्रदेशातील शहरांशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे, कथा आणि किस्से निगडीत आहेत. आता भोपाळपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेला रायसेन किल्लाच पहा. हा किल्ला अनेक शहरांआधी बांधण्यात आला होता. मात्र याच्याशी निगडित गोष्टी आजची लोकांच्या तोंडच पाणी पळवतात. किल्ल्याशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की येथे राजाने आपल्या राणीचा वध केला होता. मात्र आता यावर असा प्रश्न पडतो की, राजाने असे का केले असावे?
परमार घराण्यातील राजा राय पिथोरा याने 800 वर्षांपूर्वी हा किल्ला स्थापित केला होता. या किल्ल्याला राजाचे नाव देण्यात आले होते. माळव्यातील सुलतान बाज बहादूर याने 16व्या शतकात येथे राज्य केले. त्यानंतर मुघल सम्राट अकबर आणि शेरशाह सूरी यांनीही या किल्ल्याला आपले साम्राज्य बनवले.
हेदेखील वाचा – धर्तीवर स्वर्गाची अनुभूती! एकदा तरी भारतातील या सुंदर Flowers Valley ला नक्की भेट द्या
या किल्ल्याशी संबंधित एक कथा शेरशाह सूरीशीही निगडित आहे. अशी सांगितले जाते की, त्याने धोक्याने किल्ला बळकावला होता. तांबे वितळवून दगड तयार केले जात होते. तसेच इथे ध्वजही फडकवण्यात आले होते. आता फसवणुकीत किल्ल्यात राहणाऱ्या राजाच्या लोकांनीही शेरशाह सुरीला पाठिंबा दिला होता, जे त्यावेळी किल्ल्यातच राहत होते. त्यावेळी किल्ल्यावर राजा पुरणमल याचे राज्य होते. हे शेरशाह सुरीला कळताच त्याने राणी दुर्गावतीचा शत्रूंपासून बचाव करण्यासाठी तिचा शिरच्छेद केला.
या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकूण नऊ दरवाजे आहेत. बादल, राजा रोहिणी, हवा, जहांगी, धोबी असे अनेक राजवाडेही इथे बांधले गेले आहेत. जहांगीर महालाच्या भिंती हिरे आणि कमळांच्या नक्षीकामाने सजवल्या गेल्याचे सांगितले जाते. हवा महालात एक मोठा राणी ताल (तलाव) आहे, ज्याचा वापर शाही महिला त्यावेळी करत असल्याचे सांगण्यात येते.
सांगितले जाते की, या जागी एक चमत्कारी पारस दगडदेखील आहे. हा एक पौराणिक दगड आहे, जो धातूला अगदी सोन्यात बदलू शकतो. या दगडाला ज्याला स्पर्श होईल तो सोन्यात बदलेल. अनेकांना हे माहीत होते, त्यामुळे यासाठी अनेक युद्धे झाली. या दगडाचे रक्षण करण्यासाठी किल्ल्यावर जीन (Gene)राहत असल्याच्या, अनेक कथा सांगितल्या जातात. अनेकांनी प्रयत्न केले पण आजतागायत कोणीही हा दगड पकडू शकलेला नाही.
रायसेन किल्ला यासाठीही खास आहे कारण त्याच्या परिसरात मंदिर आणि मशीद दोन्ही बांधण्यात आले आहे. तसेच इथे अनेक घुमट बांधले आहेत. रायसेन हजरत पीर फतेह उल्ला शाह बाबा यांचा दर्गाही किल्ल्यात बांधला आहे. ते मुस्लिम संत होते. रायसेन किल्ल्यावर केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते अशी लोकांची मान्यता आहे.
रायसेन गावात रेल्वे स्टेशन नाही. हे शहर भोपाळ रेल्वे स्टेशनपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. हबीबगंज स्टेशनपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. लोकल बसने किंवा वाहनाने किल्ला बघायला जाता येते.