चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ५१ लाख रुपये खर्चून विहीर व नळपाणी योजना मंजूर झाली होती. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराने मोठे बिल उचलल्याचा आरोप होत असून सध्या ग्रामस्थांना नदीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी शिवानी सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे सुतारवाडीत जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे ५१ लाख रुपये खर्चून विहीर व नळपाणी योजना मंजूर झाली होती. मात्र काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराने मोठे बिल उचलल्याचा आरोप होत असून सध्या ग्रामस्थांना नदीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी शिवानी सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.






