मनमोहन सिंग यांच्या सुधारणांमुळे भारत ३० वर्षांच्या आर्थिक विकासाच्या मार्गावर आला: अँजेला मर्केल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Angela Merkel Manmohan Singh Memorial Lecture Delhi : जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक आणि जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल (Angela Merkel) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीत आयोजित पहिल्या ‘डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) स्मृती व्याख्याना’दरम्यान त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याचा गौरव केला. मर्केल यांनी स्पष्ट केले की, आज भारत जो आर्थिक विकास अनुभवत आहे, त्याचा पाया डॉ. सिंग यांनी १९९१ मध्ये अर्थमंत्री असताना घातलेल्या “धाडसी सुधारणांमुळे” रचला गेला आहे.
मर्केल यांनी आपल्या भाषणात १९९१ ते १९९६ या काळाचा विशेष उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता, तेव्हा मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून देशाला सावरले. त्यांनी केवळ परकीय चलन सुलभ केले नाही, तर लायसन्स राज (लाल फितीशाही) संपवून भारताची बाजारपेठ जगासाठी खुली केली.” मर्केल यांच्या मते, या एका निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर झाली आणि देशाला पुढील ३० वर्षांसाठी प्रगतीचा महामार्ग मिळाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump 2026: डोनाल्ड ट्रम्पना संपवायचे होते! ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीला हाताशी धरून इराणचे भव्य षड्यंत्र; न्यू यॉर्क कोर्टाचा खुलासा
राजकीय वादात न पडता मर्केल यांनी डॉ. सिंग यांच्या १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या, “जेव्हा २००४ मध्ये डॉ. सिंग पंतप्रधान झाले, तेव्हा भारताचे दरडोई उत्पन्न ६२४ डॉलर्स होते. २०१४ मध्ये जेव्हा त्यांनी पद सोडले, तेव्हा ते १५५३ डॉलर्सवर पोहोचले होते. ही अडीच पट वाढ डॉ. सिंग यांच्या दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.” भारताकडे सध्या असलेली तरुण लोकसंख्या आणि युरोपियन युनियनसोबत झालेला मुक्त व्यापार करार (FTA) यामुळे भारताचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
भाषणादरम्यान मर्केल यांनी एक रंजक किस्साही सांगितला. क्योटो प्रोटोकॉलच्या वेळी भारताने बंधनकारक CO2 उत्सर्जन कपात स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हा डॉ. सिंग यांनी मर्केल यांना ठणकावून सांगितले होते की, “भारतीय संसद कधीही बंधनकारक कार्बन कपात स्वीकारणार नाही.” मर्केल म्हणाल्या की, “त्यावेळी मी त्यांच्या या भूमिकेवर नाराज होते, पण त्यांच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेचा मला आदर वाटला.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AI Warfare: पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्धात भारताची एन्ट्री? डीपफेक व्हिडिओने उडवली जगभरात खळबळ; वाचा तथ्य
मर्केल यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील अलीकडील ‘मुक्त व्यापार कराराचे’ (FTA) मनापासून कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “युरोपियन युनियन ही जगातील दुसरी मोठी आर्थिक शक्ती आहे आणि भारताकडे प्रचंड क्षमता आहे. या करारामुळे दोन्ही बाजूंच्या विकासाला मोठी गती मिळेल.” भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय फायद्याचा (Demographic Dividend) उल्लेख करत त्यांनी भारतीय तरुणांच्या कौशल्याची प्रशंसा केली.
Ans: डॉ. सिंग यांनी १९९१ मध्ये केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताची बाजारपेठ खुली झाली आणि देशाला ३० वर्षांच्या प्रगतीचा मार्ग मिळाला, म्हणून मर्केल यांनी त्यांचे कौतुक केले.
Ans: मर्केल यांच्या माहितीनुसार, २००४ मध्ये ६२४ डॉलर्स असलेले उत्पन्न २०१४ पर्यंत १५५३ डॉलर्सपर्यंत, म्हणजे जवळपास अडीच पटीने वाढले.
Ans: क्योटो प्रोटोकॉल दरम्यान भारताने बंधनकारक कार्बन (CO2) उत्सर्जन कपात स्वीकारण्यास नकार दिला होता, तेव्हा मर्केल नाराज झाल्या होत्या.






