काय घडलं नेमकं?
डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी राहते. ती कल्याणमधी एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. तिचे नाव चांदनी सिंह असे आहे. ती आरबीएल बँकेत कामाला आहे. तिने निधीचे अकाऊंट उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला अकाऊंट उघडण्याचे टारगेट दिले आहे असे तिने अकाऊंट उघडताना सांगितले होते. त्यांनतर तिने अकाउंट उघडले.
काही दिवसांनी निधीच्या अकाउंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांचे ट्राझेक्शन झाले आहे. तिने केवळ एकच अकाउंट उघडले नव्हते. तर तीन ठिकाणी अकाउंट उघडले होते. अन्य एका अकाऊंटमध्ये 10 लाख रुपयांचे ट्रांझेक्शन झाल्याचे समोर आले. निधीने याबाबत चांदणीला विचारले. तेव्हा तिने टाळाटाळ केली. निधीने चौकशी केली तेव्हा तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या अकाऊंटमध्ये टाकले होते. त्या खात्यातून व्यवहार केला गेला.
प्रकरणात मनसेची उडी
या प्रकरणात उल्हासनगरात एक व्यक्ती सामील आहे. त्याची माहिती देखील निधीने पोलिसांना दिली होती. गेल्या ३ महिन्यापासून निधी पोलिसांकडे दाद मागत आहे. पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने निधीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी स्पष्ट आरोप केले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी काही माहिती दिली. परंतु डोंबिवलीतील एका विद्यार्थीनी सोबत गंभीर गुन्हा घडला आहे. उत्तराखंडातील नागरिकांना फसविले गेले आहे. तरी पोलीस दाद देत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मग कारवाई का केली नाही. त्याला असे कसे सोडून दिले. त्या संशयितांना सोडून दिल्याने या प्रकरणाचा छडा कसा लागणार? या तरुणीला आणि फसवणूक झालेल्यांना न्याय कसा मिळणार? आदी प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले आहेत.
चौकशी सुरु आहे
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात तरुणीचा अर्ज आला आहे. चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पोलीस या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत
काय घडलं नेमकं?
डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी राहते. ती कल्याणमधी एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. तिचे नाव चांदनी सिंह असे आहे. ती आरबीएल बँकेत कामाला आहे. तिने निधीचे अकाऊंट उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला अकाऊंट उघडण्याचे टारगेट दिले आहे असे तिने अकाऊंट उघडताना सांगितले होते. त्यांनतर तिने अकाउंट उघडले.
काही दिवसांनी निधीच्या अकाउंटमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांचे ट्राझेक्शन झाले आहे. तिने केवळ एकच अकाउंट उघडले नव्हते. तर तीन ठिकाणी अकाउंट उघडले होते. अन्य एका अकाऊंटमध्ये 10 लाख रुपयांचे ट्रांझेक्शन झाल्याचे समोर आले. निधीने याबाबत चांदणीला विचारले. तेव्हा तिने टाळाटाळ केली. निधीने चौकशी केली तेव्हा तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या अकाऊंटमध्ये टाकले होते. त्या खात्यातून व्यवहार केला गेला.
प्रकरणात मनसेची उडी
या प्रकरणात उल्हासनगरात एक व्यक्ती सामील आहे. त्याची माहिती देखील निधीने पोलिसांना दिली होती. गेल्या ३ महिन्यापासून निधी पोलिसांकडे दाद मागत आहे. पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने निधीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी स्पष्ट आरोप केले आहे की, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी काही माहिती दिली. परंतु डोंबिवलीतील एका विद्यार्थीनी सोबत गंभीर गुन्हा घडला आहे. उत्तराखंडातील नागरिकांना फसविले गेले आहे. तरी पोलीस दाद देत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, ही तरुणी तक्रारदार होऊ शकत नाही. मात्र या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मग कारवाई का केली नाही. त्याला असे कसे सोडून दिले. त्या संशयितांना सोडून दिल्याने या प्रकरणाचा छडा कसा लागणार? या तरुणीला आणि फसवणूक झालेल्यांना न्याय कसा मिळणार? आदी प्रश्न जाधव यांनी उपस्थित केले आहेत.
चौकशी सुरु आहे
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणात तरुणीचा अर्ज आला आहे. चौकशी सुरु आहे. या प्रकरणात पोलीस या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत






