Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या...; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangaldesh News in Marathi : ढाका : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार (Bangladesh violence) धगधगू लागला आहे. राजधानी ढाकासह पाच शहरांमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. अनेक ठिकाणी बसेस पेटवून देण्यात आल्या आहेत. अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. ठिकठिकाणी स्फोट घडवून आणले जात आहे. वृत्तानुसार आतापर्यंत १७ बस पेटवण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सराकराविरोधात आंदोलन पुकारले आहे. यामुळे बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु आहे. निषेधांच्या पार्श्वभूमीवर ढाका आणि मेमन सिंग रोड सारख्या प्रमुख शहरांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
या बंडामागचे कारण म्हणजे आज बांगलादेशच्या न्यायालयात शेख हसीनाविरुद्धच्या (Sheikh Hasina) खटल्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा पहिला निकाल लागणार आहे. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये हसीना यांना दोषी ठरवण्यासाठी अडथळा निर्माण केली जाईत. यामुळे हसीना यांच्या बांगलादेशात परतणे कठीण होईल. यामुळे या निकालामध्ये कोणही हस्तक्षेप करु नये यासाठी अवामी लीगचे लोक रस्त्यावर उतरले आहे.
शेख हसीना यांच्यावर जुलै २०२४ मध्ये त्यांच्या सरकारविरोधात झालेल्या उठावरम्यान मानवतेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अंतरिम सरकारच्या मते, हसीना यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला होता. शिवाय हसीना यांच्या अवामी लीगच्या कार्यकर्त्यांवरही याच संशयावरुन आरोप करत अटक करण्यात आली होती. आतापर्यंत १०० हून अधिक अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
POLICE ARE ATTACKING ON THE STUDENTS AGAIN FROM BOTH SIDES DHAKA TSC they are leaking gases. Rn the police and the gov goons have captured all the student protestors of DU & JU #Save_Bangladeshi_students #BDStudentsUnderAttack pic.twitter.com/yPWx0B1Jge — sana wani (@sana_wani0022) November 13, 2025
याच वेळी हसीना यांनी युनुसवर गंभीर आरोप केले आहे. बांगलादेशात आणि भारतातील संबंध बिघडवल्याचा आरोप युवनूस यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच युनूस यांच्या राजवटीत कट्टरपंथी शक्तीं राज करत असल्याचा आणि त्यांच्या हिंसाचाराला रोखण्यात युनूस अपयशी ठरले असल्याचा आरोप हसीना यांनी केला आहे. तसेच तयांनी त्यांना सत्तेवरुन हटवण्याचा कट रचल्याचाही आरोप केला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. २०२६ मध्ये फ्रेब्रुवारीत बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थिती या हिंसाचारामुळे निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेख हसीना बांगलादेशात परतणार? अंतरिम सरकारसमोर ठेवल्या ‘या’ अटी






