भारतासाठी मोठी बातमी! होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना 'ग्रीन सिग्नल' (Photo Credit- X)
पत्रकारांशी संवाद साधताना राजदूत फतहाली यांनी स्पष्ट केले की, भारत आणि इराणचे संबंध केवळ राजनैतिक नसून ते ऐतिहासिक मैत्रीवर आधारित आहेत. सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा त्यांना भारतीय जहाजांच्या सुरक्षेबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सकारात्मक संकेत दिले. “पुढील काही तासांत यावर अधिक स्पष्टता येईल, परंतु भारताला या मार्गावरून प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी इराण सकारात्मक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
#WATCH | Delhi: On giving safe passage to India, Iran’s Ambassador to India, Mohammad Fathali, says, “… Yes, because India is our friend. You will see it within two or three hours. We believe that Iran and India share common interests in the region…” pic.twitter.com/twTsE1Bjhv — ANI (@ANI) March 13, 2026
इराणच्या राजदूतांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीवर भर दिला. ते म्हणाले की, भारत आणि इराण यांचे प्रादेशिक हितसंबंध सामायिक आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर दोन्ही देशांची विचारसरणी समान राहिली आहे. कठीण काळातही दोन्ही देशांनी एकमेकांवर असलेला विश्वास ढळू दिला नाही, हेच या मैत्रीचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहम्मद फतहाली यांनी आपल्या भाषणात भारताने वेळोवेळी केलेल्या मदतीचा कृतज्ञतेने उल्लेख केला. “भारताने अनेक कठीण प्रसंगांत इराणला सहकार्य केले आहे. विशेषतः युद्धोत्तर परिस्थितीमध्ये भारताकडून मिळालेली मदत इराण कधीही विसरणार नाही,” असे ते म्हणाले. या जुन्या ऋणांुळेच आजच्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही इराण भारताच्या बाजूने उभा असल्याचे दिसून येत आहे.
जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी मोठा हिस्सा या सागरी मार्गातून जातो. भारतासाठी हा मार्ग जीवनवाहिनीसारखा आहे, कारण भारताच्या तेल आयातीचा मोठा वाटा याच सामुद्रधुनीतून येतो. या मार्गावर झालेली थोडीही अडचण भारताच्या इंधन दरांवर थेट परिणाम करू शकते. केवळ तेलच नव्हे, तर नैसर्गिक वायू आणि इतर व्यापारी मालाची वाहतूकही याच मार्गावरून होते.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक जागतिक शिपिंग कंपन्यांनी या मार्गावरून जाण्यास धास्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत इराणने भारताला दिलेला ‘ग्रीन सिग्नल’ हा केवळ मैत्रीचा पुरावा नसून, भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचा आणि यशस्वी परराष्ट्र धोरणाचा विजय मानला जात आहे. यामुळे भारताचा ऊर्जा पुरवठा सुरळीत राहण्यास मोठी मदत होणार आहे.






