
India on Middle East War
भारताने इस्रायल-इराण युद्धावर बोलताना कोणत्याही एका देशाची बाजू घेतलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबात निवेदन जारी केले आहे. या निवेदनात भारताने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी तात्काळ हिंसाचार थांबवावा. भारताच्या मते, मध्यपूर्वेतील युद्ध केवळ एका देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे भारताने दोन्ही देशांना संयम बाळगून वाद मुत्सद्देगिरीतून सोडवण्याचे आवाहन केले आहे. भारताने म्हटले आहे की, आम्ही परिस्थिती बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर व्हावा अशी आशा व्यक्त केली आहे.
याच वेळी भारताने इस्रायल आणि इराणमधील आपल्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इराणमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक माध्यांवर लक्ष ठेवण्याचा आण दूतावासाशी संपर्क साधण्याचा आवाहने केले आहे.
तसेच इस्रायली नागरिकांना देखील इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे.
ADVISORY as on 28 February 2026 pic.twitter.com/BqQv9AfNAl — India in Iran (@India_in_Iran) February 28, 2026
Ans: इराण आणि इस्रायल युद्धावर बोलताना भारताने कोणत्याही एका देशाची बाजू घेतलेली नाही. भारताने दोन्ही गटांना संयम बाळगण्याचा आणि संवादातून तणाव की करण्याचे आवाहन केले आहे.