होर्मुज स्ट्रेट वादात भारताला दिलासा! ईराण भारतीय जहाजांकडून आकारणार नाही टोल, तेहरानची स्पष्ट भूमिका
मोठं काहीतरी घडणार? अमेरिका-इराण युद्ध सुरू असतानाच उत्तर कोरियाकडून धोकादायक क्षेपणास्त्रांची चाचणी
खंर तर अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती की, ईराणी बंदरे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर संपूर्ण नाकेबंदी केली जात आहे. शस्त्रसंधीनंतरही ईराण आणि ओमान टोल कर वसूल करू शकतील, असे म्हटले जात होते. मात्र आता ईराणने स्पष्ट केले आहे की, होर्मुजमार्गे जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून टोल आकारला जाणार नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
भारतातील ईराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी दूतावासात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, तुम्ही भारत सरकारला विचारु शकता की, आतापर्यंत आम्ही त्यांच्याकडून कोणताही कर आकारला आहे की नाही. त्यांनी पुढे सांगितलं की, या कठिण काळात देखील आमचे संबंध अतिशय चांगले आहेत. आमचा विश्वास आहे की भारत आणि ईराण समान हितसंबंध प्रस्थापित करू शकतात. फताली यांनी सांगितलं की, भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.
भारतातील ईराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी म्हटलं आहे की, भारत सरकारसोबत ईराणचे संबंध अतिशय मजबूत आणि विश्वसनीय आहेत. या कठिण परिस्थित देखील भारताने स्वत:ला एक समजूतदार आणि विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिध्द केले आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक संबंध आजही दृढ आहेत. त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, भविष्यात देखील भारतीय जहाजांना होर्मुजच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्यांनी अशी मााहिती दिली आहे की, लवकरच ईराण लवकरच जहाजांच्या वाहतुकीच्या कार्यपद्धतीची रूपरेषा देणारी एक यंत्रणा जाहीर करणार आहे.
जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी जाहिर केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 15 भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी म्हटलं आहे की, आम्ही परराष्ट्र मंत्रालयासोबत संपर्क करून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या 15 भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सध्या त्या ठिकाणी एकूण 15 भारतीय ध्वज असलेली आणि भारतीय मालकीची जहाजे आहेत.






