
Defence Minister Rajnath Singh
संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषात पहलगाम हल्ला (Pahalgam Attack) आणि याला प्रत्युत्तर म्हणून भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) चाही उल्लेख केला. या मोहिमेत भारतीय संरक्षण दलांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी कौतुक केले. तसेच त्यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा देत म्हटले की, भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारतीय सैन्यात असल्याचे म्हटले.
त्यांनी म्हटले की, दहशतवादी कारवाया करुन भारतात सतत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण भारताचा संरक्षण मंत्री म्हणून, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास अतिशय प्रभावी आणि सडेतोड उत्तर शत्रूला दिले जाईल याची ग्वाही देतो असे त्यांनी म्हटले.
राजनाथ सिंह यांनी भारताच्या अण्वस्त्र धोरणावरही प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, भारत नेहमीच नो फर्स्ट युज या तत्त्वाशी आणि वचनबद्धतेशी बांधिल आहे आणि भविष्यातही राहिल. पण याचा अर्थ भारताला कोणीही धमकावू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत आपल्या शांतताप्रिय भूमिकेवर ठछान आहे. कोणत्याही देशाचे न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश राजनाथ सिंह यांनी दिला.
राजनाथ सिंह यांचा व्हिएतनाम आणि दक्षिण कोरिया(South Korea) चा दौरा सागरी सहकार्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांसोबत लष्करी आणि धोरणात्मक संबंध वाढवणे आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त उत्पादनासाठी संधी वाढविण्यावर भर देणे आहे.
सध्या राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तान(Pakistan) ला अप्रत्यक्ष इशारा आणि शांतताप्रिय संदेशामुळे जागतिक पातळीवर पुन्हा एकदा भारताची दहशतवादाविरोधी भूमिका आणि शून-सहनशीलतेचे धोरण स्पष्ट झाले आहे.
Ans: या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि धोरणात्मक संबंध वाढवणे आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त उत्पादनासाठी संधी वाढविण्यावर भर देणे आहे.
Ans: संरक्षण मंत्र्यांनी व्हिएतनामच्या भूमीवरुन पाकिस्तानचे थेट नाव न घेता कडक इशारा दिला. त्यांनी म्हटले की, शेजारी देशाने भारतविरोधी कोणतीही नापाक हरकत केली तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. तसेच कोणत्याही देशाचे न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश राजनाथ सिंह यांनी दिला.
Ans: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर शत्रूला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. या मोहिमेत भारतीय जवानांनी उत्तम कामगिरी केल्याचा उल्लेख राजनाथ यांनी केला.