सीरियात राष्ट्रपती असद यांना हटवण्याचे कारस्थान सुरूच; भारताने पुढे केला मैत्रीचा हात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दमास्कस : सीरियामध्ये युद्धसदृश परिस्थिती असून, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू आहे. दरम्यान, भारत आणि सीरियामधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर नवी दिल्लीत चर्चा झाली. भारत आणि सीरिया यांच्यात शुक्रवारी( दि. २९ नोव्हेंबर ) दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे सरकार पाडण्याचे पाश्चात्य देशांचे कारस्थान तीव्र होत असताना, भारताने आपली मुत्सद्दीगिरी केवळ शब्दांपुरती नसून संबंधांना खोलवर नेऊन दाखविण्यासाठी मैत्रीचा आणि सहकार्याचा हात पुढे केला आहे.
दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांच्या प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. भारतीय बाजूचे नेतृत्व पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका विभागाचे संयुक्त सचिव डॉ. सुरेश कुमार यांनी केले आणि सीरियाच्या बाजूचे नेतृत्व परराष्ट्र व्यवहार उपमंत्री आयमन राद यांनी केले. या संभाषणात औषधांचे क्षेत्र, विकास प्रकल्प आणि सीरियन तरुणांचा कौशल्य विकास या मुद्द्यांवर चर्चा झाली. यासोबतच प्रादेशिक आणि जागतिक परिस्थितीवरही चर्चा झाली.
भारताने नेहमीच नि:पक्षपाती भूमिका घेतली
भारत आणि सीरिया यांच्यातील संबंध केवळ मुत्सद्देगिरीपुरते मर्यादित नाहीत. हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भागीदारीवर आधारित आहेत. पाश्चिमात्य देश सतत सीरियावर दबाव टाकून असद सरकार हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असतानाही भारताने सीरियाबाबत नेहमीच नि:पक्षपाती भूमिका घेतली आहे. भारत सीरियामध्ये आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे आणि येथील तरुण पिढीला चांगल्या भविष्यासाठी तयार होण्यासाठी मदत करत आहे. या बैठकीत भारताने सीरियाच्या विकासात भारत एक विश्वासार्ह भागीदार राहील, असे आश्वासन दिले.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पुतिनच्या इशाऱ्यामुळे भयंकर नरसंहार इंग्लंडपर्यंत पोहोचणार; 32 देशांचे धाबे दणाणले, वाचा सविस्तर
भारताचे पुढचे पाऊल?
दोन्ही देशांनी ठरवलं की पुढची चर्चा सीरियात होईल. या बैठकीमुळे भारत-सीरिया संबंधांना नवी उंची तर मिळेलच, शिवाय प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्नही सुटतील. संतुलित मुत्सद्देगिरी हे भारताचे वैशिष्ट्य आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-इराण यांसारख्या वादात भारताने आपल्या नि:पक्षपाती धोरणातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सीरियासोबतच्या या मैत्रीपूर्ण उपक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारताची विश्वासार्हता केवळ आर्थिक ताकदीतच नाही तर संबंधांच्या गहनतेत आहे.
जागतिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेश ISKCON वाद विकोपाला; सचिव बेपत्ता, चिन्मय दासांना प्रसाद देण्यासाठी गेलेल्या दोन हिंदूंनाही अटक
भारताचा संदेश
जगाचा एक मोठा भाग सीरियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करत असताना भारताने प्रत्येक परिस्थितीत आपल्या भागीदारांसोबत उभा असल्याचा संदेश दिला आहे. नवी दिल्लीतील या संभाषणामुळे भारत-सीरिया संबंध केवळ मजबूत होणार नाहीत, तर पश्चिम आशियातील भारताची भूमिका आणखी मजबूत होईल.