• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Aap Punjab Government Remained In Discussion Nrvb

प्रासंगिक : सनसनाटी देखाव्याच्या मर्यादा

सामान्य माणसासाठी सत्तेच्या माध्यमातून काही करायचे तर त्यासाठी यंत्रणा लागते आणि ती सक्षम आणि मुख्य म्हणजे उत्तरदायी लागते. आहे ती यंत्रणा कुचकामी आणि निष्प्रभ आहे असा पंजाब ‘आप’च्या आमदार किंवा मंत्र्यांचा समज असेल तर ती व्यवस्था सुधारण्याची आणि ती उत्तरदायी करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. एखाद्या कुलगुरूला अपमानास्पद वागणूक देऊन मूलभूत समस्या सुटणार नाहीत.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 07, 2022 | 06:00 AM
aap punjab government remained in discussion nrvb
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिल्लीत जरी आम आदमी पक्षाला (आप) सत्ता मिळून काही वर्षे उलटली असली तरीही दिल्ली हे काही त्या अर्थाने पूर्ण राज्य नाही. तेथील कारभाराची सूत्रे नायब राज्यपालांकडे आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आहेत. तरीही तेथील सरकारच्या कामगिरीच्या दाव्यांच्या बळावर पंजाबात सत्ता मिळविण्याचा पराक्रम आपने करून दाखविला. मात्र प्रथमपासून हे सरकार काही ना काही कारणाने चर्चेत राहिले आहे.

ताजे उदाहरण आहे ते पंजाबचे आरोग्य मंत्री चेतन सिंग जौरमाजरा यांनी बाबा फरीद आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राज बहादूर यांना दिलेल्या अवमानकारक वागणुकीचे. हा अवमान जिव्हारी लागल्याने डॉ. बहादूर यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री भागवंत मान यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केल्यावरही डॉ. बहादूर यांनी राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यास नकार दिला आहे.

आपण सामान्य माणसाच्या हिताचेच राजकारण करतो हे दाखविण्याचा ‘आप’चा सतत प्रयत्न असतो; परंतु भान विसरून कारभार करीत नाही ना याचीही तपासणी करावयास हवी.

काँग्रेस, अकाली दल, भाजप या पक्षांना धोबीपछाड देत आपने पंजाबात ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या. त्यानंतर भागवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ती त्यांनी भगतसिंग यांचे गाव असणाऱ्या ठिकाणी घेतली. आपल्या पहिल्या संदेशात याचा उल्लेख करताना मान यांनी ‘यापूर्वीचे शपथविधी हे क्रिकेटची मैदाने किंवा राजभवनात होत असत’ असे सांगून आपले वेगळेपण अधोरेखित केले.

बेरोजगारी, कृषी समस्या यावर तोडगा काढण्यास आपले सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी याच संदेशात म्हटले आणि दिल्लीत मोहल्ला क्लिनिक, सरकारी शाळा पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात तशीच स्थिती पंजाबात आपण निर्माण करू असा निर्धारही मान यांनी व्यक्त केला होता. त्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी अशी ‘आप’ची प्रतिमा असल्याने त्याबद्दलदेखील मान सरकार शून्य सहनशीलता दाखवेल हे गृहीतच धरले गेले होते. तथापि हे सगळे खरे असले आणि इरादा कितीही नेक असला तरी सरकार, प्रशासन हे विशिष्ट पद्धतीने चालत असते. सत्तेतील पक्ष बदलला म्हणून यंत्रणा रात्रीत बदलत नसतात.

आपल्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री डॉ. विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मान यांनी थेट डच्चू दिला. जटेंडर स्वीकृतीसाठी सिंगला हे एक टक्का कमिशन मागत होते आणि तसा ध्वनिमुद्रित पुरावा असल्याचा दावा आरोग्य व्यवस्था महामंडळावर प्रतिनियुक्तीवर असणारे राजिंदर सिंग यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर मान यांनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केलीच पण सिंगला यांच्यावर एफआयआर दाखल होऊन त्यांना न्यायालयाने कोठडीही दिली. मात्र मंत्री झाल्याझाल्या दोनच महिन्यांत सिंगला यांना लाच घ्यावीशी का वाटली, की ते व्यवस्थेच्या दबावाला बळी पडले इत्यादी अधिक मूलभूत प्रश्नांना मान यांनी हात घातला नाही.

ताजे उदाहरण आरोग्यमंत्र्यांच्याच बाबतीत घडावे हा विचित्र योगायोग! जौरमाजरा यांना सार्वजनिक आरोग्यसेवेच्या ढासळत्या स्थितीविषयी चिंता असेल तर त्यात आक्षेपार्ह काही नाही; किंबहुना एखाद्या मंत्र्याला तशी तळमळ वाटत असेल तर ते स्वागतार्हच आहे. पण मंत्र्याला वाटणारी चिंता म्हणजे ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचे आणि ज्यांच्याकडून आपल्याला ते करून घ्यायचे त्यांचा चारचौघात उपमर्द करण्याचा परवाना नव्हे.

जौरमाजरा यांना ते भान राहिले नाही. फरीदकोट येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालयात भेट द्यायला गेले असताना मंत्र्यांना तेथील सुमार दर्जाच्या व्यवस्थांमुळे बहुधा संताप आला; त्यांनी थेट कुलगुरू डॉ. बहादूर यांना त्या वॉर्डातील घाणेरड्या खाटेवर झोपण्याचे आदेश दिले, जेणेकरून त्यांना त्या सुमार दर्जाची जाणीव व्हावी. मुख्य म्हणजे हे सर्व चित्रमुद्रित झाले.

जौरमाजरा हे आरोग्य मंत्री होऊन काही आठवडेच झाले आहेत. पंजाबमध्ये ‘आप’चे दहा आमदार डॉक्टर असताना आरोग्य खात्यासारख्या महत्वाच्या खात्यासाठी जौरमाजरा यांच्यासारख्या बारावी उत्तीर्ण आमदाराची निवड कशी झाली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होतेच. शिवाय जौरमाजरा हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. त्याउलट डॉ. बहादूर हे देशभरातील नामांकित शल्यचिकित्सकांपैकी एक आहेत.

आपल्या ४५ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अध्यापन केले आहे, शैक्षणिक संस्थांचे ते संचालक राहिले आहेत आणि कुलगुरू आहेत. त्यांना मंत्र्याने अशी वागणूक देणे सर्वथा अयोग्य. साहजिकच डॉ. बहादूर हे कमालीचे दुखावले गेले आणि त्यांनी सरळ आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. त्यानंतर पंजाबातील विरोधी पक्षांना आयतेच कोलीत मिळाले. खुद्द मुख्यमंत्री मान यांनी माफी मागितली.

सामान्य माणसाचे आपणच काय ते कैवारी असा ‘आप’चा पवित्रा असतो. मात्र त्यासाठी कायम असले नाट्यपूर्ण प्रसंग घडवून आणण्याची आवश्यकता नाही. सामान्य माणसासाठी सत्तेच्या माध्यमातून काही करायचे तर त्यासाठी यंत्रणा लागते आणि ती सक्षम आणि मुख्य म्हणजे उत्तरदायी लागते. आहे ती यंत्रणा कुचकामी आणि निष्प्रभ आहे असा पंजाब ‘आप’च्या आमदार किंवा मंत्र्यांचा समज असेल तर ती व्यवस्था सुधारण्याची आणि ती उत्तरदायी करणे ही त्यांचीच जबाबदारी आहे.

एखाद्या कुलगुरूला अपमानास्पद वागणूक देऊन मूलभूत समस्या सुटणार नाहीत. मात्र मूलभूत समस्या सुटणे हे सहज शक्यही नसते. त्यासाठी केवळ दिखाऊ धडाका असून चालत नाही तर संयमित पण निर्धारयुक्त पाऊले टाकावी लागतात आणि त्यासाठी मुळात राजकीय इच्छाशक्ती लागते. मद्यवितरण धोरण दिल्लीत ‘आप’ सरकारलाच सात महिन्यांतच मागे घ्यावे लागले, हे अशाच उतावीळपणाचे लक्षण आहे. पंजाबात ‘आप’चे आमदार रमण अरोडा यांनी एका सरकारी शाळेत जाऊन फेसबुक लाइव्हवर तेथील शिक्षकांना धारेवर धरले होते, हेही उदाहरण फार जुने नाही.

‘आप’चेच दुसरे आमदार शीतल अगरवाल यांनीही फेसबुकवरून जालंधर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ताशेरे ओढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

पंजाबात ‘आप’ला जनतेने भरभरून मते दिली आहेत ती व्यवस्था सुधारण्यासाठी; धोरणात्मक बदल करण्यासाठी. समाजमाध्यमीय देखावे आणि गवगवा याच चक्रात सरकार अडकले तर ‘आप’लीच प्रतिमा होई ‘आप’लीच वैरी अशी त्या पक्षाची अवस्था झाल्याखेरीज राहणार नाही.

राहूल गोखले

rahulgokhale2013@gmail.com

Web Title: Aap punjab government remained in discussion nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • AAP
  • Bhagwant Mann
  • Navarashtra Update
  • Punjab government

संबंधित बातम्या

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
1

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार 

WPL 2026 : दिल्ली कॅपिटल्समध्ये ‘ही’ स्टार खेळाडू सामील! तर RCB ला मोठा झटका; अष्टपैलू एलिस पेरीची माघार 

Dec 30, 2025 | 06:47 PM
Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

Dec 30, 2025 | 06:43 PM
बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

बांगलादेशातील अत्याचाराची मालिका थांबेना! आणखी एका हिंदूची हत्या; युनूस सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Dec 30, 2025 | 06:34 PM
समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम (SRFP) २०२६ अंतर्गत मोठी संधी! आताच करून घ्या अर्ज

समर रिसर्च फेलोशिप प्रोग्राम (SRFP) २०२६ अंतर्गत मोठी संधी! आताच करून घ्या अर्ज

Dec 30, 2025 | 06:33 PM
Number Plate चा रंग वेगवेगळा का असतो? लष्करापासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत, कोणासाठी कोणता रंग योग्य?

Number Plate चा रंग वेगवेगळा का असतो? लष्करापासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंत, कोणासाठी कोणता रंग योग्य?

Dec 30, 2025 | 06:31 PM
Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

Dec 30, 2025 | 06:22 PM
पाकिस्तान संघाने थोडं तरी लाजायला हवं होतं! स्वतःच्याच खेळाडूंचे पैसे घातले घशात 

पाकिस्तान संघाने थोडं तरी लाजायला हवं होतं! स्वतःच्याच खेळाडूंचे पैसे घातले घशात 

Dec 30, 2025 | 06:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Virar : भाजपचे नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसतील – खा. हेमंत सावरा

Dec 30, 2025 | 03:36 PM
THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

THANE : मनसेकडून पवन पडवळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल; शिवसेना भाजप युतीला आव्हान

Dec 30, 2025 | 03:33 PM
Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Navi Mumbai : “कोपरखैरणे प्रभागातील पुढऱ्यांनी फक्त टेंडर काढायची कामं केली” – शिरीष पाटील

Dec 29, 2025 | 07:30 PM
Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Solapur News : तृतीयपंथी Ayyub Sayyad च्या खून प्रकारणातील तिघांना अटक

Dec 29, 2025 | 07:23 PM
Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Dec 29, 2025 | 06:43 PM
Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Mumbai : विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक हवी, काँग्रेस-वंचित आघाडीवर वर्षा गायकवाडांचं वक्तव्य

Dec 29, 2025 | 06:36 PM
Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Ahilyanagar : निवडणूक आयोगाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

Dec 29, 2025 | 06:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.