• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Ajit Pawar And Land Dispute Of Pune Nrsr

संशयकल्लोळ

उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच गोत्यात आले आहेत. भूखंडाचा एक आरोप त्यांच्यावर तत्कालिन पोलीस आयुक्तांनी निवृत्तीनंतर लिहीलेल्या पुस्तकातून केला. या आरोपातील तथ्य काय, किती हे त्या लेखिका मीरा बोरवणकर आणि अजित पवार यांनाच ठाऊक. पण अजित पवार यांच्याभोवती पुन्हा संशयाचे ढग गोळा झाले. या ढगांमध्ये अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न किंवा महत्त्वाकांक्षा झाकोळून टाकण्याची ताकद आहे?

  • By साधना
Updated On: Oct 22, 2023 | 06:00 AM
संशयकल्लोळ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अजित पवार यांच्यामागे वाद, संशय, आरोप कदाचित चुंबकासारखे ओढले जातात. जिथे कुठे अजित पवार गेले, तिथे त्यांच्यावर आरोप झाले, संशय निर्माण झाला, हे गेल्या अनेक वर्षात पहायला मिळते. मूळात पवार आणि संशय, यांचेच जुने नाते असावे. शरद पवार यांच्याभोवतीही असेच संशयाचे धुके कायम असायचे, आजही असते. यांचे काही खरे नाही किंवा केव्हा काय करतील, याचा नेम नाही ही प्रतिमा राजकारणी म्हणून चांगली की वाईट हा वादाचा विषय असेल कदाचित, पण तो पवारांना लागू आहे. ते काहीही करू शकतात, असे कार्यकर्ते एकमेकांना बजावत असताना ‘काहीही’चा अवाका खूप मोठा असतो. त्यामुळे मग ती प्रतिमा तयार होते आणि आपलीच प्रतिमा आपलीच वैरी, याचाही अनुभव येऊ लागतो. शरद पवार काहीही करू शकतात, या प्रतिमेनेच त्यांच्या महत्वकांक्षेला प्रत्यक्षात येण्यापासून हुलकावणाी दिली. पवारांचे कर्तृत्व, त्यांची राजकीय ताकद सांगत असताना त्यांची बेभरवशाचे नेते, अशी प्रतिमा तयार होत गेली. त्याला काही अंशी राजकीय डावपेच जसे कारणीभूत आहेत, तसेच चिकटलेली प्रतिमा कारणीभूत आहे.

अजित पवार आणि संशय, हेसुद्धा एक समिकरण आहे. पंतप्रधानांनी जाहीर व्यासपीठावर अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यापूर्वीही त्यांच्यावर अनेक आरोप झाले. सातत्याने सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यावर जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराचा प्रमुख आरोप होते. शरद पवार यांच्या पाठीशी चिकटलेला लवासा, मुंबई साखळी बॉम्बस्फोट आणि दंगलीच्या वेळची भूमिका यातून त्यांना संशयाने घेरलेले असते. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या भोवती आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपामुळे संशयकल्लोळ सुरु असतो. आधीच्या सरकारातील निधी वाटप असेल किंवा नंतर जलसंधारण, संशयाचे भूत अजित पवार यांच्या मानगुटीवर कायम आहे. हे भूत उतरवण्यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न करायला हवे आहेत. पण पहाटेच्या शपथविधीनंतर भाजप आणि खुद्द राष्ट्रवादीकडूनच अजित पवार कसे बेभरवशाचे नेते आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. भाजपची मंडळभ आज अजित पवार यांच्याबाबत काहीही बोलत नाही. मात्र, अजित पवार यांच्यावरील आरोपांमागे आत्ता आतापर्यंत तेसुद्धा होते.

विदर्भ मराठवाड्याचा हक्काचा निधी पश्‍चिम महाराष्ट्राकडे वळविणे असू देत नाहीतर जलसंधारणाच्या कामात मुरलेला पैसा. कृष्णा खोरे असू देत नाहीतर अविनाश भोसले या बिल्डरची अमाप संपत्ती. अजित पवार यांच्याकडेच संशयाची सुई वळविण्याचा त्यांच्या विरोधकांनी पद्धतशीर प्रयत्न केला. तो खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. पहाटेचा शपथविधी त्यानंतरचे नाट्य यातही अजित पवार खलनायक. अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात अजित पवार यांना बोल लावून विरोधक मोकळे होताना दिसले. अगदी गेल्या वर्षी शिवसेनेत पडलेली फूट किंवा सरकार पडण्यामागे अजित पवार निधी वाटपात अन्याय करीत असल्याचाही आरोप करण्यात आला. तेच अजित पवार पुन्हा नव्या सरकारमध्ये आले, पण हे कोणी विचारायचे नाही.

पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी निवृत्तीनंतर ‘मॅडम कमिश्‍नर’ हे पुस्तक लिहीले. पोलीस आयुक्त असतानाचे अनुभव यात त्यांनी लिहीताना पुणे जिल्ह्यातील एका दादा मंत्र्याने पोलिसांची तीन एकर जमीन खासगी बिल्डरला देण्यासाठी आपल्यावर दबाव आणला, आपण ही जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे कसा हा मंत्री चिडला आणि त्याने नकाशा भिरकावून लावला. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी हा ‘व्यवहार’ पूर्ण केला अशा आशयाची माहिती दिली आहे. पुणे, दादा मंत्री आणि जमीन म्हटल्यानंतर कोणासमोरही इतर दुसरे नाव येणे शक्यच नाही. अजित पवार यांचेच नाव वाचकांसमोर यावे, असेच वर्णन ‘मॅडम कमिश्‍नर’ने केले आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी अशा प्रकारे दबाव आणला, असे या अधिकार्‍याचे म्हणणे आहे. त्यावर जोरदार चर्चा सुरु झाली. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या आरोपांमुळे थोडी सुखावली. अजित पवारांवर आरोप झाले, त्यांच्याभोवती संशयाचे ढग दाटले यापेक्षा भाजपच्या वळचणीला गेलेल्या अजित पवार यांच्यावर आरोप झाले, याचे समाधान त्यांच्यासाठी मोठे होते.

पालकमंत्र्यांचे अधिकार, आपली पुण्यातील भूमिका, मीरा बोरवणकर यांना कशासाठी बोलावले होते या सगळ्या विषयांचा सविस्तर खुलासा अजित पवार यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विषय अगदी तारीख, वारासह मांडला. आता यानंतर कदाचित अजित पवार या विषयावर पुन्हा बोलणार नाहीत. कोणी विचारलेच तर – ए काय रे, नेहमी – नेहमी तेच तेच विचारतो असे एखाद्या पत्रकाराला दरडावून गप्प करतील. पण त्यातून त्यांच्यावर पुन्हा उमटलेला नवा ओरखडा लपणार नाही. पुण्यातील भूखंड त्यांचा बराच पिच्छा पुरवणार, हे सध्यातरी वाटते आहे. या प्रकरणात अजित पवार यांनी एकाच महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आणि ते म्हणजे निवृत्त अधिकार्‍यांनी पुस्तक लिहिण्यासाठीचे नियम किंवा निकष.

व्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेल्या, व्यवस्थेच्या प्रत्येक अवस्थेसाठी बरोबरीने जबाबदार असलेल्या आणि आयुष्यभर सरकारी साधन, सुविधांवर काढणार्‍या सनदी अधिकार्‍यांनी निवृत्तीनंतर सरकार, व्यवस्था आणि यंत्रणांवर आरोप करणे काही नवे नाही. एखादा नेता, लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ मंत्री यांच्यावर आरोप करायचा आणि पुस्तकाला प्रसिद्धी मिळवायची हा प्रकार अनेकदा घडताना दिसतो. ज्यांनी व्यवस्थेचा भाग असताना बदल घडवून आणणे अपेक्षित असते, अशा अधिकार्‍यांनी व्यवस्था कशी निगरगट्ट आहे आणि आपण कसे त्यात भरडले गेलो, याचे रडगाडे निवृत्तीनंतर गाणे हेच निरर्थक आहे. त्यावेळी म्हणजे व्यवस्थेत सक्रीय असताना वारा वाहिल तिकडे पाठ फिरवणारे आपण कसे त्यापासून अलिप्त राहिलो हे मोठ्या अभिमानाने सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. निवृत्तीनंतर ही हिम्मत का येते? कशासाठी येते? निवृत्तीनंतर सनदी अधिकाराची सगळी कवच कुंडलं उतरल्यानंतर सर्वसामान्यांचा कळवळा कशासाठी? तर प्रसिद्धी, एखादे नवे पद मिळविण्याचा हव्यास किंवा कोणालातरी अडचणीत आणण्याचा उद्देश याऐवजी दुसरे यातून काही फारसे साध्य होत नाही. ‘मॅडम कमिश्‍नर’सुद्धा यापेक्षा खूप काही साध्य करेल असे नाही. या पुस्तकाने राजकारणाला नवा विषय दिला. दोन – चार दिवसांचे चर्चित चर्वण घडवून आणले. आणि अजित पवार यांच्या भोवतीच्या अनेक संशयांपैकी अजून एका मुद्द्यावरील त्यांच्या भूमिका संशयाच्या पिंजर्‍यात नेऊन ठेवली. या संशयकल्लोळाने येणार्‍या काळातील अजित पवारांच्या महत्वकांक्षेला नख लागू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण यावर त्यांच्याच निकटवर्तीयांचे, सहकार्‍यांचे अनेकांचे मौन खूप सूचक आहे.

– विशाल राजे

Web Title: Ajit pawar and land dispute of pune nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Rashtrawadi Congress

संबंधित बातम्या

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
1

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट
2

Cyclone Shakti: महाराष्ट्रावर मोठं संकट! मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना शक्ती वादळाचा धोका, आयएमडीने दिला अलर्ट

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

खांद्यावरुन ब्लाऊज सतत उतरतो? मग झटपट फिटिंग करण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

IND vs WI: कुलदीप यादवमुळे रविंद्र जडेजाचे स्वप्नं राहिले अपूर्ण, नाहीतर केला असता ‘हा’ रेकॉर्ड

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.