• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Touch Of Victory For Indian Hockey

भारतीय हॉकीला विजयाचा परिसस्पर्श!

आजतागायत भारतीय हॉकी संघ बऱ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर पूर्वार्धात वर्चस्व गाजवायचा. परंतु दुसऱ्या अर्धामध्ये फिटनेसमुळे जिंकत आलेल्या लढती गमावायचा. भारतीय हॉकीपटूंकडे तेव्हाही अप्रतिम कौशल्य होते आणि आजही आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीच्या मैदानावरून हॉकी हा खेळ कृतिम पृष्ठभागाच्या मैदानावर आला आणि गुणवत्तेने फिटनेसच्या पुढे मान तुकविली. बऱ्याच वेळा फिटनेस कमी असल्याने आपण जिंकलेली हॉकी युद्ध हरलो आहोत. यावेळी मात्र तसे घडले नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 24, 2023 | 03:34 PM
भारतीय हॉकीला विजयाचा परिसस्पर्श!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय हॉकी संघाने एशियन चॅम्पीयनशीप स्पर्धा सलग चौथ्यांदा जिंकली. सलग चार विजेतीपदे, म्हटली की पूर्वीचा भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ आठवतो. अलिकडे तर आशिया खंडातच फक्त पाकिस्तानच नव्हे तर मलेशिया, जपान, कोरिया आदी आव्हानवीर तयार झाले आहेत. भारतासाठी हा विजय, येत्या महिन्याभरातच चीनमध्ये होणाऱ्या ‘एशियाड’ स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. हा विजय अंतिम सामन्यात मलिशियाकडे ३-१ अशी आघाडी असताना मिळविला आहे; हेही विशेष. निर्णायक सामन्यात, पराभवाच्या दारातून परतत भारताने मिळविलेला हा विजय महत्वाचा आहे. भारतीय हॉकीची शैली अजूनही जिवंत आहे. मात्र या शैलीला फिटनेसची अभूतपूर्व जोड आणि साथ मिळाल्यामुळे हा विजय साध्य झाला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय हॉकी संघाच्या कौशल्याची रसभरीत वर्णने आपण नेहमीच ऐकतो. अलिकडच्या काळात ते क्षण फार काळ वाट्याला येत नसत. परंतु चेन्नईच्या राधाकृष्णन स्टेडियमवर दोन आठवड्यांच्या कालावधीत हॉकी रसिकांनी एक वेगळीच हॉकी अनुभवली.

भारतीय हॉकीपटूंचे अद्भूत पदलालित्या पाहिले. सफाईदार पासेस पाहिले. सफाई-सहजता पाहिली एखाद्या प्रवाहीत नदीतील पाण्याचा वेग, पाहिला, जो भारतीयाच्या खेळात कायम राहीला. अंतिम सामन्यात १-३ अशा पिछाडीवर असतानाही न खचलेला भारतीय संघ पाहिला. ज्या संघाने बाजी अलेशियावरच ४-३ अशी उलटविली. या भारतीय संघात भारताच्या काही सर्वोत्तम हॉकीपटूंसारखे हिरोज नव्हते. प्रतिपक्षाचा बचाव भेदत जाणाऱ्या महंमद शाहीदसारखे पदलालित्य असलेल्या मोहोरा या संघात नव्हता. पण या संघातला मनप्रीतसिंगही काही कमी नव्हता. बचावफळीला हुलकावण्या देत, त्यांचा बचाव सहजपणे भेदत जाणाऱ्या मनप्रीतची चेंडूवरील हुकूमत कमालीची होती. आणि हे सारं तो हवं तेव्हा तेवढ्या वेळेत करीत होता. धनराज पिल्लेच्या वेगाशी कदाचित सुसंगत नसेलही; पण चेंडूसाठी वेगात पळणारे मनदीप आणि आकाशदीप सिंग इतरांच्या आधीच चेंडूवर झडप घालताना दिसायचे.
संघातील तरुण कोवळा वेगवान सेल्वम कराथी याच्या फिटनेसलाही दाद द्यावी लागले, असा झंझावात पाहिला.

आजतागायत भारतीय हॉकी संघ बऱ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांवर पूर्वार्धात वर्चस्व गाजवायचा. परंतु दुसऱ्या अर्धामध्ये फिटनेसमुळे जिंकत आलेल्या लढती गमावायचा. भारतीय हॉकीपटूंकडे तेव्हाही अप्रतिम कौशल्य होते आणि आजही आहे. मात्र नैसर्गिक हिरवळीच्या मैदानावरून हॉकी हा खेळ कृतिम पृष्ठभागाच्या मैदानावर आला आणि गुणवत्तेने फिटनेसच्या पुढे मान तुकविली. बऱ्याच वेळा फिटनेस कमी असल्याने आपण जिंकलेली हॉकी युद्ध हरलो आहोत. यावेळी मात्र तसे घडले नाही. जेटलॅगला मागे टाकत भारताने चीनविरुद्ध लढतीत सहज विजय मिळविला खरा; पण जपानविरुद्ध विजयासाठी डोके फोड करावी लागली. कोरियाविरुद्धचा कठिण पेपर सोडविला. मात्र तोपर्यंत संघाला सूर गवसला होता. पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सामन्यापासून भारताला सूर गवसायला लागला. खरं तर पाकिस्तान संघात पूर्वीचा जोश राहिलेला नाही. मात्र या संघाविरुद्ध खेळताना कोणत्याही खेळात भारतीय खेळाडूंवर दडपण हे असतेच. उपांत्य सामन्यात मात्र भारतीयांचा उंचावलेला दर्जा स्पष्ट दिसायला लागला होता.

मलेशियाविरुद्ध लढतीत भारतीय संघ एखाद्या परिपूर्ण संघासारखा खेळला. सुरुवातीपासून आघाडी घेऊन कुणीही लढत जिंकू शकते. अंतिम फेरीत मात्र तसे घडले नाही. भारताच्या पहिल्या गोलनंतर मलेशियाने यजमानांना हादरविले. चक्क ३-१ अशी आघाडी घेऊन पिछाडीवरून आघाडी घेत सामना जिंकायला निधडी छाती लागते. कौशल्य लागतेच; परंतु अभूतपूर्व दमछाकही लागते. आघाडी घेतल्यानंतरचा अधिक भक्कम बचाव भेदणे म्हणजे महाकठीण काम असते. पण भारतीयांनी ते केले. प्रतिपक्षाच्या गोलक्षेत्रात वारंवार धडका मारीत राहीले. ४५व्या मिनिटाला तो क्षण अखेर आला. गुरजंतसिंगने गोलमुखावरील गर्दीतही लक्ष्य अचूक साधले. पेनल्टी स्ट्रोकने भारताला बरोबरी साधण्यात मदत केली होतीच. त्यानंतर मात्र अखेरचा पंच भारतीयांनी मलेशियाला मारला. सलग चौथ्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

ही तर सुरुवात आहे. केवळ फिटनेस या एकमेव भांडवलावर भारताने स्पर्धा जिंकली नाही. आणि हा फिटनेस देखील एका रात्रीत मिळविलेला नाही. त्यापाठी डेव्हिड जॉन, लोम्बार्ड, रॉबीन आर्केल आणि अॅलन टॅन यांची गेल्या कित्येक महिन्यांची मेहनत आहे. अखेरच्या क्षणी बाजी उलटविण्यासाठी फिटनेसबरोबरच खेळाची गुणवत्ताही लागते. तीच या भारतीय संघाकडे आहे; हे विशेष. मिळालेल्या संधीचा अचूक लाभ उठविण्याचे कौशल्य आहे. बचाव भक्कम करून आघाडी टिकविण्याची क्षमता या संघात आहे. आणि गरजेचे असेल तेव्हा आक्रमणाच्या तोफा डागायची कुवतही या संघाची आहे. मधली फळी संघाचा प्रमुख आधार आहे. बचाव फळी गोलपोस्टचे रक्षण करण्याइतपत सक्षम आहे; ज्यामुळे गोलरक्षकावरचे दडपण कमी होईल.

संघाचा कप्तान हरमनप्रीतसिंग म्हणतो की, “प्रशिक्षक क्रेग फुलटन यांची संघाच्या ढाच्यातच बदल केला. त्यांनी आपण जिंकू शकतो, हा विश्वास आमच्यात निर्माण केला. आखलेल्या योजनांच्या बाबतीत विश्वास दिला. मैदानावरील चुकांचे स्वत:च अवलोकन करण्याची दृष्टी दिली. त्या चुका सर्वोत्तम खेळाडूकडूनही होऊ शकतात. त्यामुळे त्या विसरून लगेचच सामन्याच्या उर्वरित भागावर लक्ष केंद्रित करण्याची शिकवण प्रशिक्षक फुलटन यांनी दिली.
अर्थातच फुलटन यांच्यासारखे कसलेले, अनुभवी प्रशिक्षक या विजयाने हुरळून जाणार नाहीत, याची खात्री आहे. खेळाडूंचेही पाय जमिनीवरच राहतील याचीही ते काळजी घेतील. कारण महिन्यानंतर ‘एशिया’ हॉकी स्पर्धा अधिक चुरशीची, अधिक कठीण असणार आहे याची जाणीव त्यांना आहे. चीनमधील स्पर्धेत यजमान चीनदेखील अधिक बलवान असणार आहे. पराभवानंतर त्वेशाने उसळून प्रतिस्पर्ध्यांवर अधिक ताकदीने स्वारी करण्याची पाकिस्तानची परंपराच आहे.

एशियाड हॉकी त्यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची असेल. त्यामुळे यावेळप्रमाणे पाकिस्तानला अंगावर घेणे सहज सोपे नसेल; हेही फुलटन जाणून आहेत. जपानने, या स्पर्धेत आपल्यापेक्षा वरचे रॅन्कींग असलेल्या कोरियाला हरवून आपण आपले एशियाड हॉकीचे विजेतेपद राखण्याइतपत सक्षम असल्याचे सूचित केले आहे. आशियाई हॉकीत पदक पटकावू न शकलेल्या कोरीयाला हे अपयश अधिक सलत असेल. त्यामुळे नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेतील यशाने हुरळून न जाता भारतीयांनी यापुढील आव्हानांवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. मलेशियाविरुद्ध अंतिम सामन्यातील पिछाडीवरून पुढे येत मिळविलेला विजय ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र एशियाड हॉकीमध्ये आव्हाने यापेक्षा कठीण असणार आहेत. कारण सर्वच संघांनी या स्पर्धेसाठी काहीतरी राखून ठेवले आहे. काही संघांनी प्रमुख खेळाडू या स्पर्धेत उतरविले नव्हते. त्याशिवाय परिस्थितीही वेगळी असणार आहे. चीनमधील हॅगशू येथील हवामान, आहार आणि बदललेली समीकरणे याचाही विचार व्हायला हवा.

– विनायक दळवी 

Web Title: Touch of victory for indian hockey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • article
  • Navrashtra

संबंधित बातम्या

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
1

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

पुरुषाला लाजवेल असा करारी बाणा; त्याग आणि शौर्य म्हणजे आहिल्याबाई होळकर
2

पुरुषाला लाजवेल असा करारी बाणा; त्याग आणि शौर्य म्हणजे आहिल्याबाई होळकर

Goa Statehood Day: देशाला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्ष गुलामगिरी सहन केली; स्वतंत्र गोव्याचा ‘असा’ आहे रक्तरंजित इतिहास
3

Goa Statehood Day: देशाला स्वातंत्र्य मिळूनही अनेक वर्ष गुलामगिरी सहन केली; स्वतंत्र गोव्याचा ‘असा’ आहे रक्तरंजित इतिहास

Mothers Day Special : “देशसेवा हीच ईश्वरसेवा”; वीरमाता अनुराधा गोरे यांची शौर्यगाथा
4

Mothers Day Special : “देशसेवा हीच ईश्वरसेवा”; वीरमाता अनुराधा गोरे यांची शौर्यगाथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

पुन्हा परतणार 2019 चा काळ? Tiktok च भारतात होणार पुनरागमन? वेबसाईट पुन्हा लाईव्ह, नक्की काय आहे गोंधळ?

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

National Space Day 2025 : ISRO च्या यशाचे दुसरे पर्व साजरे; जाणून घ्या भारताच्या अंतराळ प्रवासाची महान गौरवगाथा

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

राजस्थानचा चविष्ट आणि अनोखा स्ट्रीट फूड ‘कांजी वडे’ कधी खाल्ले आहेत का? चटाकेदार चवीने भरलेला हा पदार्थ एकदा घरी बनवाच!

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे वाढले दर

ऐन सणासुदीच्या काळात महागाईचा फटका; डाळ, साखर, मैदा, रव्याचे वाढले दर

गौरीगणपतीच्या सणाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचेसाठी १५ मिनिटांमध्ये घरीच करा फेस स्क्रब, डेड होईल कायमची गायब

गौरीगणपतीच्या सणाला ग्लोईंग आणि चमकदार त्वचेसाठी १५ मिनिटांमध्ये घरीच करा फेस स्क्रब, डेड होईल कायमची गायब

बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत… म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत… म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

Astro Tips: सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी ज्योतिषशास्त्राशी संबंधित करा ‘हे’ उपाय

Astro Tips: सूर्य आणि बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी ज्योतिषशास्त्राशी संबंधित करा ‘हे’ उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.