• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Telecom Authority Of India Has Blacklisted 50 Telemarketing Companies

टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, तब्बल इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!

Spam Calls and Messages : देशातील मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून मोबाईल वापरकर्त्यांची स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यासाठी ट्रायने तब्बल ५० टेलिमार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. परिणामी, आता देशभरातील मोबाईल वापरकर्ते सुटकेचा निश्वास टाकणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 03, 2024 | 10:42 PM
टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!

टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!टेलिमार्केटिंग कंपन्यांवर ट्रायचा हातोडा, इतक्या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत; मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्हीही तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे त्रस्त आहात का? आपल्यापैकी बरेच जण या समस्येमुळे त्रस्त असाल. विषेश म्हणजे काही नागरिकांची तर अशी तक्रार असते की, या स्पॅम कॉल्स आणि मेसेजमुळे जगणे मुश्किल झाले आहे. मात्र, आता अशा कंपन्यांनविरोधात टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) कारवाईचा हातोडा उगारला आहे. ट्रायने आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या सुमारे ५० टेलिमार्केटिंग कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

५० टेलिमार्केटिंग कंपन्या काळ्या यादीत

विशेष म्हणजे टेलिमार्केटिंग कंपन्यांनी देशातील मोबाईल फोन वापरकर्त्यांचे जगणे कठीण केले आहे. असे असतानाच काही कंपन्यांविरोधात ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी देखील ट्रायकडे दाखल झाल्या आहेत. दूरसंचार क्षेत्रातील नियामक ट्रायकडे टेलिमार्केटिंग कंपन्यांविरुद्ध विविध प्रकारच्या सुमारे 8 लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दूरसंचार कंपन्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने सुमारे ५० टेलिमार्केटिंग कंपन्यांना ट्रायकडून काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

हे देखील वाचा – टाटा समुहाचा ‘हा’ शेअर घेणार मोठी उसळी? आत्ताच खरेदी करा… मिळणार तब्बल 23 टक्क्यांपर्यंत परतावा!

काय म्हटलंय ट्रायने याबाबत?

टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी ते जून पर्यंत) नोंदणी नसलेल्या टेलिमार्केटिंग कंपन्यांविरोधात 7.9 लाखांहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. ही समस्या गांभीर्याने घेत ट्रायने १३ ऑगस्ट २०२४ रोजी टेलिमार्केटिंग कंपन्यांना कठोर सूचना जारी केल्या होत्या. मात्र, काही दूरसंचार कंपन्यांनी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

हे देखील वाचा – विकायला काढली होती सरकारने ‘ही’ कंपनी; तिनेच मिळवून दिलाय सरकारला 2,413 कोटींचा लाभ!

स्पॅम कॉल्स कमी होण्यास मदत होणार

टेलिकॉम कंपन्यांनी स्पॅम कॉल्स आणि मेसेजसाठी संसाधनांचा गैरवापर केल्याने, या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ट्रायने सुमारे 50 कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, 2.75 लाखांहून अधिक एसआयपी, डीआयडी, मोबाइल नंबर आणि दूरसंचार साधने देखील खंडित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता टेलिकॉम कंपन्यांचे स्पॅम कॉल्स कमी होण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे आता देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: Telecom authority of india has blacklisted 50 telemarketing companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 07:09 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.