या शाळांमुळे स्थलांतरित मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर कृष्णा कारखान्यात दाखल झाले आहेत. या मजुरांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यासाठी चेअरमन डॉ.सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्य शिबिरे, मूलभूत सुविधा आणि आता विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा उपक्रमांतून कारखाना आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय साहित्यात पाटी, पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वह्या, तसेच गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश होता. साखर शाळांच्या यशस्वी संचालनासाठी जनार्थ सेवा संस्थेचे सहकार्य लाभत असून, या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रसंगी जनरल मॅनेजर केन दादासाहेब शेळके, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान यांच्यासह शेती व उसविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






