Maharashtra Board Result Date : दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली? मात्र गुणपत्रिकेत होणार मोठे बदल! (फोटो सौजन्य : एआय जनरेटेड)
यावर्षी बारावीच्या विद्यार्थांची परिक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्याची परीक्षा २० ते १८ मार्च 2026 या कालावधीत पार पडली. तसेच आता विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकाची तपासणी पूर्ण झाली असून मुल्यांकन देखील झाले आहे. पण गुणपत्रिकेतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यावर क्युआर कोड दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. हा क्युआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थाची संपूर्ण माहिती समजेल. तसेच या वर्षीपासून बोर्ड गुणपत्रिका व प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे तर एकाच पानावर मिळणार आहेत. त्यावर विद्यार्थ्याचा फोटो असेल, असेही सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षात बोर्ड परीक्षा उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र तयार करत असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. बोर्डाने पहिल्यांदाच हा बदल केल्याने बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. सध्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्राची छपाई सुरू असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. निकालानंतर एक महिन्याने विद्यार्थ्याना गुणपत्रिका आणि बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.
गेल्या वर्षापासून अकरावीच्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. त्यामुळे १७ मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने ऑनलाइन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्याना महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार आहेत. याचेही नियोजन माध्यमिक शिक्षण विभाग केले आहे.






