फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून ५ मे २०२६ रोजी भरती प्रक्रिया सुधारणेअंतर्गत नवीन प्रवेश नियम लागू करण्यात आले आहेत. पूर्वी अ, ब आणि क संवर्गातील Audit, Accounting, Taxation आणि Finance यासारख्या तांत्रिक पदांसाठी वाणिज्य पदवी अनिवार्य होती. पण आता ही अट शिथिल करण्यात आली असून ‘कोणत्याही शाखेतील पदवी’ (Any Graduate) असणारा उमेद्वार या पदासाठी अर्ज करू शकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. तांत्रिक ज्ञान आवश्यक असलेल्या पदांवर बिगर वाणिज्य पदवीधरांची नियुक्ती करणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या कष्टाचे अवमुल्यन आहे.
तसेच जर विद्यार्थ्यांच्या या मागण्यांचा फेरविचार करून शासनाने वाणिज्य पदवीधरांना न्याय दिला नाही तर यावेळी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.






