रावसाहेब पटवर्धन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला "प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान"
दिवाळी ही तेजस्वी दिव्यांनी सजलेली, फुलांच्या माळांनी सजलेली आणि भरपूर स्वादिष्ट गोड पदार्थांनी असते. हा सण दरवर्षी संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. हिंदू धर्मातील सर्वात खास आणि महत्त्वाच्या सणांपैकी दिवाळी हा पहिला मानला जातो, कारण हा सण प्रत्येकासाठी खूप आनंद आणि नवीन उत्साह घेऊन येतो. दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र – मैत्रिणीं, नातेवाईकांना भेटून शेभुच्छा देतात.सध्याच्या काळात दिवाळीचा सण आपल्यासोबत खूप प्रदूषण घेऊन येतो. जसे की दिवाळीच्या काळात फटाके, रसायने आणि प्लास्टिकचा वापर वाढतो सर्वांना माहीत आहे. ज्यामुळे दीर्घकाळ प्रदूषण होते, पण या प्रदूषणापासून आपण आपले पर्यावरण (Environment) वाचवू शकतो. याचदरम्यान रावसाहेब पटवर्धन विद्यालयात प्रदूषण मुक्त दिवाळी अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी हे अभियान राबवण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण व आरोग्यास होणारे दुष्परिणाम याबाबत पुष्पक कांदळकर सर व शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रदूषण मुक्त दिवाळीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले. रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि फटाकेमुक्त, स्वच्छ व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणे हा होता.
या अभियानाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी फटाके न फोडण्याची आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणावर तसेच माणसाच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक पुष्पक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रदूषणाचा वाढता धोका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या छोट्या कृतीतूनही पर्यावरण संवर्धनात मोठा वाटा उचलता येतो, हे समजावून सांगितले. शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी फटाके न फोडता आनंदी आणि सुरक्षित दिवाळी कशी साजरी करता येते, याचे महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवे, कागदी सजावट आणि सेंद्रिय रंग वापरून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “हरित दिवाळी, सुरक्षित दिवाळी” या घोषणांद्वारे संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून शालेय स्तरावरच पर्यावरण रक्षणाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी दृढतेने व्यक्त केला.