काय घडलं नेमकं?
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोमवारी तरुणांच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काही वेळातच, हा वाद टोकाला पोहोचला आणि वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात तीन जण गंभीररीत्या जखमी झाले.
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला तर इतर २ जखमी तरुणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दीपक शिवाजी नालकोल (20 वर्षे) असे आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.
बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराईच्या चोपड्याचीवाडी येथ चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. घरात राहणाऱ्या कुटुंबियांवर काठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकरण दहशत माजवण्याचा असल्याचे दिसून येत आहे.
कारण काय?
मारहाण झालेल्या कुटुंबीयांनी शासनाच्या गायरानावर अतिक्रमण केले असून तिथे गेलेल्या दोन मेंढ्या मारून मेंढपाळ लोकांना मारहाण केली. यावरून हा वाद वाढला आणि थेट चार घराकची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना
Ans: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे घटना घडली.
Ans: २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ans: इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपवरील स्टोरी-स्टेटसवरून वाद वाढून हल्ला झाला.






