काय घडलं नेमकं?
मृतकाचे नाव सन्नी कुमार सिंह (१८ वर्ष) असे आहे. मृत तरुण हा इंटरमिजिएटचा विद्यार्थी होता. तो धनुपरा येथील त्याच्या घरातून एका मित्रासोबत क्लाससाठी निघाला होता. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, सन्नीने त्याच्या चुलत भावाला फोन करून तो काही लोकांसोबत असल्याचं त्याने सांगितले होतं. यानंतर त्याने त्याच्या सख्ख्या भावाला फोन करून सांगितलं की काही तरुण त्याला बळजबरीने बाईकवर बसवून गडहनीच्या दिशेने घेऊन जात आहेत, त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. त्यानंतर, त्याचा मोबाईल बंद झाला.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबात गोंधळ उडाला. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी नवादा पोलीस स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, एका तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, सत्य घटना उघडकीस आली.
का करण्यात आली हत्या?
इंस्टाग्रामवर झालेल्या वादानंतर ही हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप केला आहे. मृत तरुणाचं इंस्टाग्राम अकाउंटवर एका मुलीसोबत वाद झाला होता आणि त्या वादातून संबंधित मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसोबत मिळून पीडित तरुणाचं अपहरण केलं, नंतर, त्याला बेदम मारहाण केली आणि गळा दाबून त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील पिपरहिया रेल्वे अंडरपासच्या जवळ असलेला मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस तपास करता असून आता चौकशीत काय समोर येत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त
Ans: बिहारच्या आरा शहरातील नवादा पोलीस स्टेशन हद्दीत.
Ans: इंस्टाग्रामवर एका मुलीसोबत झालेल्या वादातून तिच्या प्रियकराने सूड उगवला.
Ans: 3 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होणार आहे.






