Uttar Pradesh: लघुशंकेसाठी बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांना टँकरने चिरडलं; 6 जणांचा मृत्यू, तर…
काय घडलं नेमकं?
दोघी पीडित बहिणी मंदिरातून परतत होते त्यावेळी अंधार झाल्यामुळे त्यांच्या मावस भावाने आणि अमन खान नावाच्या त्याच्या मित्राने त्यांना घरी सोडतो असे सांगितले. रात्री उशीर झाल्याचे कारण सांगून ते दोघेही पीडितेच्या घरी थांबले. रात्रीच्या वेळी दोन्ही नराधमांनी या बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर बलात्कार केला.
अत्याचार केल्यांनतर दुसर्या दिवशी सकाळी आरोपींना लग्नाचे अमिश दाखवून दोघीनींही सोबत घेतले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवासासाठी आणि राहण्या-खाण्यासाठी पैसे नसल्याचे नाटक करत आरोपी मावस भावाने पीडितेकडून 40 हजार रुपये रोख आणि चांदीचे जोडवे हडपून घेतले. त्यानंतर दोघींनाही तिथेच सोडून मावसभाऊ आपल्या मित्रासह पसार झाला.
मात्र काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला जेव्हा मावशीच्या घरी चौकशीसाठी गेली, तेव्हा तिथेही आरोपी सापडला नाही. शेवटी पीडित महिला माहेरी पोहोचली असता तिला तिथे आरोपी मावस भाऊ दिसला. जेव्हा तिने पैशांची मागणी केली तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी मावस भावाने यापूर्वीही पीडित महिलेसोबत अत्याचार केला होता, मात्र भीतीपोटी तिने तेव्हा कोणालाही काही सांगितले नाही.
मात्र शेवटी तिने हिंमत एकवटून घडलेली सगळी घटना आपल्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दखल केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Bihar Crime: चार मित्रांनी एकत्र घेतलं उचललं टोकाचं पाऊल; एकाच कंपनीत करायचे नोकरी; काय घडलं नेमकं ?
Ans: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे.
Ans: पीडितेचा मावसभाऊ आणि त्याचा मित्र.
Ans: गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे.






