काय नेमकं प्रकरण?
संतोष माधवराव बेंद्रीकर हा आपल्या शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेकडे सातत्याने वाईट नजरेने पाहत होता. वेळोवेळी त्याने महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. अखेर त्रास सहन न झाल्याने संबंधित महिलेने २२ डिसेंबर रोजी संतोष बेंद्रीकरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला.
गुन्हा दाखल होताच गावात दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी आणि त्याचं कुटुंबीयांनी थरकाप उडवणारा कट रचला. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेच्या पतीला एकटे गाठण्याची संधी साधली. पहाटेच्या वेळी पीडित आपल्या गोठ्यात असतांना आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी पतीच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.
उपचार सुरु
जखमी अवस्थेत पतीने आरडाओरडा केला आणि काही ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले, त्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. तातडीने पीडित व्यक्तीला रुगालयात दाखल करण्यात आले. यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. पीडित व्यक्ती सुमारे ५० टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर मुख्य आरोपी संतोष बेंद्रीकरसह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेनंतर बेंद्री गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात बंदोबस्त वाढवला आहे. नारिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Ans: नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बेंद्री गावात.
Ans: विवाहित महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्याचा राग.
Ans: जखमीची स्थिती काय आहे?






