काय घडलं नेमकं?
मृत अमृत हा बिनौली पोलीस स्टेशन परिसरातील बरवड गावाचा रहिवासी होता. अमृतला त्याचा मित्र समीरने त्याच्या गावी, तित्रौडा येथे होळीच्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले होते. समीरच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत, अमृत त्याचे भाऊ सागर आणि मित्र कार्तिक आणि बॉबीसह तित्रौडा गावात गेले. तेव्हा समोर आणि त्याचे मित्र तित्रौडा गावातील एका चिकनच्या दुकानातून चिकन खरेदी करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की समीर आणि त्याच्या मित्रांनी अमृतवर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमृताच्या मानेवर, छातीवर आणि कमरेवर अनेकदा चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
Bangalore crime: बंगळुरूमध्ये हुंड्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरचा छळ; महिलेने उचलले टोकाचे पाऊल
यात अमृत गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस तपास करत आहे.
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताची आई आणि बहीण दुबईमध्ये काम करत होते. त्यांचे भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. या घटनेने शोककळा पसरली आहे.
फोटो-व्हिडिओ वादातून भडकला राग; प्रेयसीने साथीदारांसह पेट्रोल ओतून प्रियकराला जिवंत जाळलं
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी आणि तिच्या साथीदारांनी मिळून आपल्या प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाले. ही घटना उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील आहे. या घटनेत पीडित तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा पाच दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान हत्या झाली.
तू मला शिळे जेवण का देतेस? नशेत असणाऱ्या तरुणाने वडील अन् बहिणीला अक्षरक्ष:..; नेमका विषय काय?
Ans: उत्तर प्रदेशातील तितौडा गावात.
Ans: चिकन खरेदीदरम्यान झालेल्या वादातून हल्ला झाल्याचे समोर आले.
Ans: गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू आहे.






