निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता; अजित पवारांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- Social Media)
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अद्याप मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले नसले तरी त्यांनी आशा सोडलेली नाही. “कधी ना कधी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की होईन.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित महाराष्ट्र महोत्सव कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे सूचक विधान केलं आहे. राज्याला आता एका महिलेला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळायला हवी का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “हो, ती चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी संधी आणि योग्य वेळ मिळणं गरजेचं असतं. मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण अद्याप तशी संधी मिळालेली नाही. मात्र, तो दिवस नक्की येईल.” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “ममता बॅनर्जी आणि जयललिता यांनी स्वतःच्या ताकदीवर सत्ता मिळवली. जयललिता यांनी अनेक अडचणींवर मात करत ‘अम्मा’ म्हणून जनतेच्या मनात स्थान मिळवलं. अशा कितीतरी महिला आजवर देशातील विविध राज्यांमध्ये मुख्यमंत्री झाल्या आहेत. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा लाभलेला राज्य आहे. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ताराराणी यांचं प्रेरणादायी कर्तृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होईल, आणि तो दिवस फारसा दूर नाही, असं मला वाटतं.”
१७व्या मजल्यावरून उडी मारून ३५ वर्षीय महिलेची आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद
“राज्यात अनेक राजकीय पक्ष आले आणि गेले. अनेकदा आमच्यात वैचारिक मतभेद झाले, पण मनभेद होणे अयोग्य आहे. राजकीय नेत्यांनी सौहार्द जपलं पाहिजे. अनेक वेळा राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेत्यांमध्ये मैत्रीची उदाहरणं आपण पाहिली आहेत,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. यापूर्वी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होते. सरकार कोसळल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबतचा संबंध सोडून भाजपच्या महायुतीत प्रवेश केला आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. अजित पवारांना गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांना वाटतं की चाचा शरद पवार यांच्याकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. 1991 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बारामतीतून लोकसभेवर निवडून येऊन नंतर ती जागा शरद पवारांसाठी सोडली होती. ते गेल्या चार दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत.
मोफत मिळणार इव्हो गन स्किन, जाणून घ्या आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem
सध्या अजित पवार त्यांच्या एका विधानामुळे टीकेचा धनी ठरत आहेत. 28 मार्च रोजी बारामतीत एका कार्यक्रमात त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत म्हटले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या शक्य नाही. त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर हप्ते भरण्याचं आवाहन केलं होतं. या विधानावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे.